शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलची रेंज सातत्याने गुल, ऑनलाइन शिक्षणात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

अहमदपूर : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात ...

अहमदपूर : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे. परिणामी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. रेंजसाठी उंचीवरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नयेत म्हणून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. नर्सरीपासून ते उच्चशिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मोबाइल, संगणकावरून शिक्षण देण्यात येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. तालुक्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात शहरी भागात २५ हजार आणि ग्रामीण भागात ३३ हजार विद्यार्थी आहेत.

शाळेतील शिक्षकांनी वॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर अभ्यास देत आहेत. मुलांनी केलेल्या अभ्यासाचीही तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे शाळा जरी ऑफलाइन असल्या तरी विद्यार्थी मात्र ऑनलाइन अभ्यासात व्यस्त आहेत. मात्र, शहरासह ग्रामीण भागात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत आहे. त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे.

शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, डाक कार्यालय, अंगणवाड्यांना इंटरनेट सेवा जोडून विविध योजना राबवीत आहेत; परंतु येथे मोबाइलला पुरेशी रेंज राहत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाइलवर कॉल केला तरी व्यवस्थित रेंज मिळत नाही. त्यामुळे सातत्याने संवाद तुटत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे; परंतु शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

इयत्तानिहाय ग्रुप तयार...

तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे वॉटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्या- त्या वर्गाचे शिक्षक संपर्क करीत असतात. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक दिली जाते, असे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी सांगितले.

रस्ता खोदकामामुळे अडचण...

शहरास ग्रामीण भागातील हडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव येथे ४ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. वायगाव, कुमठा, अंधोरी, चिखली, सुनेगाव सांगवी येथे २ जी सेवा उपलब्ध आहे. महामार्गाच्या खोदकामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस बीएसएनएलच्या वायरचे नुकसान होत आहे. ही वायर सतत तुटत आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे अडचण येत आहे, असे बीएसएनएलचे अधिकारी बी.एन. गुट्टे यांनी सांगितले.