शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मोबाइलची रेंज सातत्याने गुल, ऑनलाइन शिक्षणात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

अहमदपूर : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात ...

अहमदपूर : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे. परिणामी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. रेंजसाठी उंचीवरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नयेत म्हणून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. नर्सरीपासून ते उच्चशिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मोबाइल, संगणकावरून शिक्षण देण्यात येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. तालुक्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात शहरी भागात २५ हजार आणि ग्रामीण भागात ३३ हजार विद्यार्थी आहेत.

शाळेतील शिक्षकांनी वॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर अभ्यास देत आहेत. मुलांनी केलेल्या अभ्यासाचीही तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे शाळा जरी ऑफलाइन असल्या तरी विद्यार्थी मात्र ऑनलाइन अभ्यासात व्यस्त आहेत. मात्र, शहरासह ग्रामीण भागात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत आहे. त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे.

शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, डाक कार्यालय, अंगणवाड्यांना इंटरनेट सेवा जोडून विविध योजना राबवीत आहेत; परंतु येथे मोबाइलला पुरेशी रेंज राहत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाइलवर कॉल केला तरी व्यवस्थित रेंज मिळत नाही. त्यामुळे सातत्याने संवाद तुटत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे; परंतु शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

इयत्तानिहाय ग्रुप तयार...

तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे वॉटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्या- त्या वर्गाचे शिक्षक संपर्क करीत असतात. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक दिली जाते, असे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी सांगितले.

रस्ता खोदकामामुळे अडचण...

शहरास ग्रामीण भागातील हडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव येथे ४ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. वायगाव, कुमठा, अंधोरी, चिखली, सुनेगाव सांगवी येथे २ जी सेवा उपलब्ध आहे. महामार्गाच्या खोदकामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस बीएसएनएलच्या वायरचे नुकसान होत आहे. ही वायर सतत तुटत आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे अडचण येत आहे, असे बीएसएनएलचे अधिकारी बी.एन. गुट्टे यांनी सांगितले.