शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मृग नक्षत्रात वरुणराजाची कृपा झाली; लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद

By हरी मोकाशे | Updated: June 22, 2024 18:44 IST

आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ, लातूर जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही घटली

लातूर : उन्हाचे तीव्र चटके सहन करीत पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांचे पावसाळ्याकडे डोळे लागले होते. मृगाने प्रारंभीपासून दमदार बरसात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्या घटली आहे, तर पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद झाले आहेत. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून बळीराजाबरोबर प्रशासनाच्याही आशा उंचावल्या आहेत.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७०६ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र, त्या तुलनेत गेल्यावर्षी केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या, नाले वाहिले नाहीत. मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर खरीपातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. जिल्ह्यातहिवाळ्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसू लागले आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचला. त्यामुळे उन्हाबरोबर पाण्यासाठी नागरिकांची होरपळ वाढली.

टंचाई निवारणासाठी होती ५८४ अधिग्रहणे...जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ४२९ गावांना ५८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. त्याचबरोबर ३१ गावे आणि १६ वाड्यांना ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मृगाच्या प्रारंभापासून पाऊस झाल्याने काही प्रमाणात जलसाठा झाला. गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी आल्याने प्रशासनाने ९१ अधिग्रहणे बंद केली. त्याचबरोबर १४ टँकर बंद करण्यात आली आहेत.

सध्या जिल्ह्यात ४९३ अधिग्रहणे...तालुका - अधिग्रहणेलातूर - ७६औसा - ००निलंगा - १०८रेणापूर - ८५अहमदपूर - ९८चाकूर - ३८शिरुर अनं.- २०उदगीर - २९देवणी - ०९जळकोट - ३०एकूण - ४९३

औसा तालुक्यातील सर्व टँकर बंद...जिल्ह्यात सर्वाधिक अधिग्रहणे व टँकर औसा तालुक्यात सुरु होते. दरम्यान, औसा तालुक्यात मृगाचा दमदार पाऊस झाल्याने सर्व अर्थात दहाही टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच लातूर आणि रेणापूर तालुक्यातील एक तर जळकोटातील दोन टँकर बंद करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १९१ मिमी पाऊस...तालुका - पाऊस (मिमी)लातूर - २१२.२औसा - २३८.१अहमदपूर - १४८.७निलंगा - २०४.१उदगीर - १४९.०चाकूर - २११.१रेणापूर - २२९.९देवणी - १५१.७शिरुर अनं. - १६४.१जळकोट - ८४.७एकूण - १९१.२

३६ गावांना ३० टँकर सुरु...पावसामुळे पाणीटंचाई कमी झाली असली तरी सध्या ३६ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात लातूर तालुक्यात १३, रेणापूर - १, अहमदपूर- ७, उदगीर- ३, जळकोट तालुक्यात ६ टँकर सुरु आहेत. तसेच ३६९ गावांना ४९३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाच दिवसांपासून पावसाची उघडीप...मृगाच्या प्रारंभापासून पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीसही वेग आला आहे. मात्र, गेल्या पाच- सहा दिवासांपासून पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असल्याने आभाळाकडे नजरा लागत आहेत.

दमदार पावसामुळे टँकर, अधिग्रहण घटले...पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस झाल्याने जलसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ टँकर आणि ९१ अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत.- बाळसाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी