शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लातूर, उस्मानाबादेत रबी पेरणीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:48 IST

परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा

ठळक मुद्देऔसा तालुक्यात सर्वाधिक पेरणीपावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़

- अशपाक पठाण/बाबूराव चव्हाण  लातूर/उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा झाला असून, आतापर्यंत लातूरमध्ये २०.३२, तर उस्मानाबादेत १४.२८ टक्के पेरणी झाली आहे़  

कृषी विभागाच्या दप्तरी लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे एकुण क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टर आहे़ १५ नोव्हेंबरपर्यंत ३९ हजार ६६१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ औसा तालुक्यात सर्वाधिक पेरणी असून सर्वात कमी जळकोट तालुक्यात केवळ ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकरी जमिनीचा वापसा होण्याची वाट पाहात आहेत़ काही ठिकाणी पावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़ पुढील आठवड्यात जास्त पेरण्या होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने रबी पेरणीसाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यामध्ये उस्मानाबाद ७८ हजार ३०० हेक्टर, तुळजापूर ५० हजार ८०० हेक्टर, परंडा ५४ हजार १००, भूम ३१ हजार ३००, कळंब ४५ हजार, उमरगा ३६ हजार १००, वाशी १० हजार १०० तर लोहारा तालुक्यातील २५ हजार १०० हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित आहे़ 

यापैकी आजघडीला अवघ्या ४१ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तिही केवळ परंडा आणि वाशी तालुक्यात. या दोन्ही तालुक्यात मिळून ४० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. 

यंदा उतारा कमी होण्याची भीतीउर्वरित उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांत अद्याप रबीची पेरणी झालेली नाही, असे कृषी विभागाने शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे. पेरणीस उशीर होत गेल्यास रबी पिकांचा उतारा कमी होईल, अशी भीती आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस