शहरं
Join us  
Trending Stories
1
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
2
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
3
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
4
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
5
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
6
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
7
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
8
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
9
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
10
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
11
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
12
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
13
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
14
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
15
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
16
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
17
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
18
अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क
19
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Daily Top 2Weekly Top 5

लातूर, उस्मानाबादेत रबी पेरणीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:48 IST

परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा

ठळक मुद्देऔसा तालुक्यात सर्वाधिक पेरणीपावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़

- अशपाक पठाण/बाबूराव चव्हाण  लातूर/उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा झाला असून, आतापर्यंत लातूरमध्ये २०.३२, तर उस्मानाबादेत १४.२८ टक्के पेरणी झाली आहे़  

कृषी विभागाच्या दप्तरी लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे एकुण क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टर आहे़ १५ नोव्हेंबरपर्यंत ३९ हजार ६६१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ औसा तालुक्यात सर्वाधिक पेरणी असून सर्वात कमी जळकोट तालुक्यात केवळ ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकरी जमिनीचा वापसा होण्याची वाट पाहात आहेत़ काही ठिकाणी पावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़ पुढील आठवड्यात जास्त पेरण्या होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने रबी पेरणीसाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यामध्ये उस्मानाबाद ७८ हजार ३०० हेक्टर, तुळजापूर ५० हजार ८०० हेक्टर, परंडा ५४ हजार १००, भूम ३१ हजार ३००, कळंब ४५ हजार, उमरगा ३६ हजार १००, वाशी १० हजार १०० तर लोहारा तालुक्यातील २५ हजार १०० हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित आहे़ 

यापैकी आजघडीला अवघ्या ४१ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तिही केवळ परंडा आणि वाशी तालुक्यात. या दोन्ही तालुक्यात मिळून ४० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. 

यंदा उतारा कमी होण्याची भीतीउर्वरित उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांत अद्याप रबीची पेरणी झालेली नाही, असे कृषी विभागाने शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे. पेरणीस उशीर होत गेल्यास रबी पिकांचा उतारा कमी होईल, अशी भीती आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस