शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

लातूर, उस्मानाबादेत रबी पेरणीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:48 IST

परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा

ठळक मुद्देऔसा तालुक्यात सर्वाधिक पेरणीपावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़

- अशपाक पठाण/बाबूराव चव्हाण  लातूर/उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा झाला असून, आतापर्यंत लातूरमध्ये २०.३२, तर उस्मानाबादेत १४.२८ टक्के पेरणी झाली आहे़  

कृषी विभागाच्या दप्तरी लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे एकुण क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टर आहे़ १५ नोव्हेंबरपर्यंत ३९ हजार ६६१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ औसा तालुक्यात सर्वाधिक पेरणी असून सर्वात कमी जळकोट तालुक्यात केवळ ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकरी जमिनीचा वापसा होण्याची वाट पाहात आहेत़ काही ठिकाणी पावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़ पुढील आठवड्यात जास्त पेरण्या होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने रबी पेरणीसाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यामध्ये उस्मानाबाद ७८ हजार ३०० हेक्टर, तुळजापूर ५० हजार ८०० हेक्टर, परंडा ५४ हजार १००, भूम ३१ हजार ३००, कळंब ४५ हजार, उमरगा ३६ हजार १००, वाशी १० हजार १०० तर लोहारा तालुक्यातील २५ हजार १०० हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित आहे़ 

यापैकी आजघडीला अवघ्या ४१ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तिही केवळ परंडा आणि वाशी तालुक्यात. या दोन्ही तालुक्यात मिळून ४० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. 

यंदा उतारा कमी होण्याची भीतीउर्वरित उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांत अद्याप रबीची पेरणी झालेली नाही, असे कृषी विभागाने शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे. पेरणीस उशीर होत गेल्यास रबी पिकांचा उतारा कमी होईल, अशी भीती आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस