शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती; लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे शुध्दीकरण

By राजकुमार जोंधळे | Updated: July 26, 2024 17:57 IST

ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात.

लातूर : पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होते. त्यातून जलस्त्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. हे पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात. पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ५ हजार १४३ जलस्त्रोत शुध्द करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात. पावसाळ्याच्या प्रारंभी पाऊस झाल्याने या स्त्रोतांच्या परिसरात पाण्याचा निचरा होतो आणि हे स्त्रोत दूषित होण्याची अधिक शक्यता असते. दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर आदी जलजन्य आजार उद्भवण्याची भीती असते. अशा आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य व पंचायत विभागाच्या वतीने १५ दिवस मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली.

पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती...वैयक्तिक व परिसर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची साठवणूक व्यवस्थित नसणे, अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेले पाणी पिल्याने जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर असे आजार उद्भवतात.

पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत...स्त्रोत - संख्यानळ पाणीपुरवठा विहिरी - ८५५हातपंप/ विद्युत पंप - ३२०७सार्वजनिक आड/ विहिरी - १०८१एकूण - ५१४३

निलंगा तालुक्यात सर्वाधिक जलस्त्रोत...तालुका - जलस्त्रोत संख्याअहमदपूर - ४३६औसा - ६८९चाकूर - ५४०देवणी - २५१जळकोट - ३५४लातूर - ७४३निलंगा - ८४१रेणापूर - ४०९शिरुर अनं. - २२१उदगीर - ६५९

पावसाळ्यात घ्या अधिक काळजी...जलजन्य आजारांच्या साथीच्या कालावधीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा. घराबाहेर पडताना घरचे निर्जंतुक केलेेले पाणी सोबत घ्यावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. त्यामुळे पिण्याचे स्त्रोत दूषित होतात. नेहमी हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत. वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवावी. जुलाब, उलटीचा त्रास होत असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रथमोपचार म्हणून मीठ, साखर व पाणी या जलसंजीवनीचा अथवा ओआरएस पावडरचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

गाव पातळीवर जनजागृती...ही मोहीम जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेसाठी जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. अशुकेत वैरागे, येसलवाड, बाबू जाबेर सय्यद यांच्यासह आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, जलसुरक्षकांनी सहकार्य केले. दरम्यान, गाव पातळीवर साथीच्या आजारासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

पावसाळ्यात साथीच्या आजारांची भीती...पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवण्याची भीती असते. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार १४३ जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जलजन्य आजारांच्या कालावधीत नागरिकांची अधिक दक्ष राहून आरोग्याची काळजी घ्यावी.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीLatur z pलातूर जिल्हा परिषद