शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती; लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे शुध्दीकरण

By राजकुमार जोंधळे | Updated: July 26, 2024 17:57 IST

ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात.

लातूर : पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होते. त्यातून जलस्त्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. हे पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात. पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ५ हजार १४३ जलस्त्रोत शुध्द करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात. पावसाळ्याच्या प्रारंभी पाऊस झाल्याने या स्त्रोतांच्या परिसरात पाण्याचा निचरा होतो आणि हे स्त्रोत दूषित होण्याची अधिक शक्यता असते. दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर आदी जलजन्य आजार उद्भवण्याची भीती असते. अशा आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य व पंचायत विभागाच्या वतीने १५ दिवस मिशन जलस्त्रोत शुध्दीकरण मोहीम राबविण्यात आली.

पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती...वैयक्तिक व परिसर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची साठवणूक व्यवस्थित नसणे, अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेले पाणी पिल्याने जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर असे आजार उद्भवतात.

पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत...स्त्रोत - संख्यानळ पाणीपुरवठा विहिरी - ८५५हातपंप/ विद्युत पंप - ३२०७सार्वजनिक आड/ विहिरी - १०८१एकूण - ५१४३

निलंगा तालुक्यात सर्वाधिक जलस्त्रोत...तालुका - जलस्त्रोत संख्याअहमदपूर - ४३६औसा - ६८९चाकूर - ५४०देवणी - २५१जळकोट - ३५४लातूर - ७४३निलंगा - ८४१रेणापूर - ४०९शिरुर अनं. - २२१उदगीर - ६५९

पावसाळ्यात घ्या अधिक काळजी...जलजन्य आजारांच्या साथीच्या कालावधीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा. घराबाहेर पडताना घरचे निर्जंतुक केलेेले पाणी सोबत घ्यावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. त्यामुळे पिण्याचे स्त्रोत दूषित होतात. नेहमी हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत. वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवावी. जुलाब, उलटीचा त्रास होत असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रथमोपचार म्हणून मीठ, साखर व पाणी या जलसंजीवनीचा अथवा ओआरएस पावडरचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

गाव पातळीवर जनजागृती...ही मोहीम जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेसाठी जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. अशुकेत वैरागे, येसलवाड, बाबू जाबेर सय्यद यांच्यासह आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, जलसुरक्षकांनी सहकार्य केले. दरम्यान, गाव पातळीवर साथीच्या आजारासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

पावसाळ्यात साथीच्या आजारांची भीती...पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवण्याची भीती असते. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेच्या माध्यमातून ५ हजार १४३ जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जलजन्य आजारांच्या कालावधीत नागरिकांची अधिक दक्ष राहून आरोग्याची काळजी घ्यावी.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीLatur z pलातूर जिल्हा परिषद