शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

लातूरच्या बाजारपेठेत तुरीचे दर घसरले; मूग, सोयाबीन स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:06 PM

बाजारगप्पा : उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात आणखीन वाढ होण्याची आशा व्यक्त होत असताना याच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

दीपावलीच्या पाडव्या दिवशी सर्वच शेतमालाला उच्चांकी दर मिळाला़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि शेती उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात आणखीन वाढ होण्याची आशा व्यक्त होत असताना या शेतमालाच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे़ मुग, सोयाबीनचा दर मात्र स्थिर आहे़ सोयाबीनला सध्या ३ हजार ४८१ रुपये असा भाव मिळत आहे़

आवक घटली की दरात वाढ होते, हा बाजारपेठेतील सर्वसाधारण नियम आहे़ लातूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते़ त्यापाठोपाठ तुरीचा पेरा असतो़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपातील शेतमालाच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे़ त्यामुळे सोयाबीनला सुरुवातीपासूनच ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता़ यंदा सोयाबीनला दर चांगला असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

 शासनाने सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये अशी आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी गत आठवड्यापासून खुल्या बाजारपेठेतील दर ३ हजार ४८१ रुपये पोहोचले आहेत़ त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या पदरी प्रति क्विं़ ज्यादा ४८० रुपये पडत आहेत़सध्या बाजारपेठेत गत वर्षीतील तुरीची आवक थोड्याफार प्रमाणात सुरु आहे़ दैनंदिन १६९ क्विं़ होणारी आवक स्थिर असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत सध्या कमाल दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे़ मुगाची आवक निम्म्याने घटली असून ६५२ क्विं़ आवक होत आहे़ कमाल दरात ७० रुपयांनी वाढ झाली असली तरी सर्वसाधारण दर स्थिर असून तो ५ हजार रुपये आहे़

बाजारपेठेत उडदाचीही आवक घटली आहे़  गत आठवड्याच्या तुलनेत कमाल दरात ५८३ रुपयांची घट झाली आहे़ सध्या ५ हजार २४० रुपये असा भाव मिळत आहे़ दरम्यान, पिवळ्या ज्वारीची आवक घटत असून दरात मोठी वाढ होत आहे़ सध्या २५३ क्विं़ आवक असून कमाल दर ४ हजार ६२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़  सध्या बाजारपेठेत बाजरीस प्रति क्विं़ १८००, गहू- २३००, हायब्रीड ज्वारी- १४००, रबी ज्वारी- ३५००, मका- १३००, हरभरा- ४ हजार ५५०, करडई- ३६५०, तीळ- १२ हजार ५००, गुळ- २ हजार ८९५, धन्यास ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे़

शासनाने मुगास ६ हजार ९७५ रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे़ परंतु, बाजारपेठेत भाव हा हमीभावाच्या जवळपासही एकदाही पोहोचला नाही़ त्यामुळे ज्यांच्याकडे मुग आहे, असे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत़ तसेच उडीद विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी असली तरी प्रत्यक्षात ३७ शेतकऱ्यांची १८९ क्विं़ खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७ हजार ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ प्रत्यक्षात ११ पैकी एका केंद्रावर ११ शेतकऱ्यांची १०६ क्विं़ खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारपेठेत सोयाबीन विक्री केल्यानंतर विनाविलंब हाती रक्कम पडत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजारपेठेकडे आहे़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी