शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वनक्षेत्र वाढीसाठी तालुकानिहाय मास्टर प्लान तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

लातूर : राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ ...

लातूर : राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक काम करून ग्रीन लातूर जिल्हा निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय वृक्ष लागवडीचा मास्टर प्लान तयार करावा व त्यानुसार वृक्ष लागवड करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड मोहीम आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमान मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, विभागीय वन अधिकारी गायकर, सामाजिक वनीकरण विभागाचे सुनील शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील जमिनीवर बांबू लागवडीचे किमान २ हेक्टर क्षेत्रावर डेमो प्लांट तयार करावेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे. सध्या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यात फक्त ६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभाग व वन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट व रेणापूर या छोट्या तालुक्यांना ५०० एकर बांबू लागवडीचे उद्दिष्ट द्यावे तर उर्वरित तालुक्यांना किमान एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

भूकंपग्रस्त गावात वृक्ष लागवड करावी...

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावात गावठाण भागात वृक्ष लागवड करून तो भाग वनाच्छादित करण्यासाठी आराखडा सादर करावा. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व वृक्षांनी नटलेले व इतरांसाठी आदर्श असणारे असे गाव निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत. यासाठी पथदर्शक प्रकल्प म्हणून बाभळगावपासून सुरुवात करावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.