शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

By संदीप शिंदे | Updated: August 22, 2023 13:27 IST

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे.

चाकूर : तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असून, काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, लातूररोड पासून चाकूर शहर ते अलगरवाडी फाटापर्यंत रस्त्याची चाळणी झाली आहे. अनेकदा खड्डे बुजविण्यात आले असले तरी निष्कृष्ट कामामुळे परत खड्डे पडत आहेत. त्यातच धुळीचा त्रास वाढल्याने वाहनचालक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. विश्रामगृह, जूने बसस्थानक, शहरानजिकचे पूल, पुढे पेट्रोल पंप, न्यायालय, तहसील येथील बसस्थानक तर विश्वशांतीधाम मंदीर, चाकूर ते अलगरवाडी फाटा या भागातही रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर लाखों रूपयाची उधळपट्टी झाली. मात्र, रस्ते मात्र दुरुस्त झालेच नाहीत. या रस्त्यावर हॉट मिक्सचे काम करण्यासाठी निविदा काढून कोटीचे उधळपट्टी झाली तरी रस्ता जैसे थे आहे.

शहरानजिक ओद्योगिक वसाहतीचे दोन रस्ते आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने या भागातून जाणारी वाहने औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचा वापर करत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाहने या रस्त्यावर धावू लागली आहेत. त्यामुळे हाही रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची मागणी आहे.

मर्यादेपेक्षा जास्त धुळीचे प्रमाण...या रस्त्यावर धूळीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे दमा, खोकला, ॲलर्जी यासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवास करताना धुळीपासून संरक्षण होईल. याची काळजी प्रवासी वर्गाने घ्यावी. - डॉ. दीपक लांडे, वैद्यकिय अधीक्षक

एमआयडीसीचा रस्ता खराब होतोय...औद्योगिक वसाहतीचा रस्ता हा वाहतुकीसाठी नाही. तो फक्त वसाहतीतील उद्योजकांसाठी आहे. सध्या वहसातीतील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. जड वाहने, वाळूची टिपर भरधाव वेगात धावत आहेत. त्यामुळे नव्याने केलेला रस्ता खराब होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आमच्याकडे निधी नाही. - करिमसाब शेख, चेअरमन औद्योगिक वसाहत

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात वाढले...वाहनांचा आम्ही रोड टॅक्स भरुनही रस्ते व्यवस्थित नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे लक्ष नाही. परिणामी, आम्हाला या खराब रस्त्यामुळे वाहनाचे मेंन्टनस मोठ्या प्रमाणावर करावे लागते शिवाय अपघात वाढले आहेत. - प्रविण मुंडे, चालक

महामार्ग प्राधिकरणाला सुचना करणार...लातूररोड ते चाकूरमार्गे आलगरवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडली आहेत. धुळ मोठ्या प्रमाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचना देऊन या समस्या सोडविण्यात येतील. अन्यथा कायदेशीर कारवाई करणार आहे. - रेणुकादास देवणीकर, तहसीलदार

टॅग्स :laturलातूरPotholeखड्डेhighwayमहामार्ग