शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

विवाह सोहळ्यातील भोजनातून दोनशे वऱ्हाडींना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:01 IST

वऱ्हाडी मंडळींना घरी जाताच रात्री मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला.

निलंगा (जि. लातूर) : विवाह सोहळ्यातील भोजनातून २०० वऱ्हाडी मंडळींना मळमळ, पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांच्यावर अंबुलगा बु., वलांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील एका मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी दुपारी १२.३० वाजता केदारपूर येथे पार पडला. विवाह झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले. त्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी आपल्या गावी निघून गेली. दरम्यान, रात्री ८ ते ९ वा. पासून भोजन केलेल्या वऱ्हाडी मंडळींना मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नजीकच्या वलांडी, अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काटेजवळगा, जवळगा उपकेंद्रात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास २०० जणांवर उपचार करण्यात आले.

जवळग्याचे येथील सरपंच हनुमंत बिराजदार यांनी वलांडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकास बोलावून १०७ जणांवर उपचार करुन घेतले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात आली. अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे म्हणाले, आतापर्यंत ७० रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या पोटात दुखणे, उलटी, जुलाब असा त्रास होता. सर्वांची प्रकृती चांगली असल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तसेच सोमवारी सकाळी नवीन आणखी १० असे रूग्ण आले होते, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर