शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विवाह सोहळ्यातील भोजनातून दोनशे वऱ्हाडींना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:01 IST

वऱ्हाडी मंडळींना घरी जाताच रात्री मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला.

निलंगा (जि. लातूर) : विवाह सोहळ्यातील भोजनातून २०० वऱ्हाडी मंडळींना मळमळ, पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांच्यावर अंबुलगा बु., वलांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील एका मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी दुपारी १२.३० वाजता केदारपूर येथे पार पडला. विवाह झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले. त्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी आपल्या गावी निघून गेली. दरम्यान, रात्री ८ ते ९ वा. पासून भोजन केलेल्या वऱ्हाडी मंडळींना मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नजीकच्या वलांडी, अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काटेजवळगा, जवळगा उपकेंद्रात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास २०० जणांवर उपचार करण्यात आले.

जवळग्याचे येथील सरपंच हनुमंत बिराजदार यांनी वलांडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकास बोलावून १०७ जणांवर उपचार करुन घेतले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात आली. अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे म्हणाले, आतापर्यंत ७० रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या पोटात दुखणे, उलटी, जुलाब असा त्रास होता. सर्वांची प्रकृती चांगली असल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तसेच सोमवारी सकाळी नवीन आणखी १० असे रूग्ण आले होते, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर