शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

विवाह सोहळ्यातील भोजनातून दोनशे वऱ्हाडींना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:01 IST

वऱ्हाडी मंडळींना घरी जाताच रात्री मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला.

निलंगा (जि. लातूर) : विवाह सोहळ्यातील भोजनातून २०० वऱ्हाडी मंडळींना मळमळ, पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांच्यावर अंबुलगा बु., वलांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील एका मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी दुपारी १२.३० वाजता केदारपूर येथे पार पडला. विवाह झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले. त्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी आपल्या गावी निघून गेली. दरम्यान, रात्री ८ ते ९ वा. पासून भोजन केलेल्या वऱ्हाडी मंडळींना मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नजीकच्या वलांडी, अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काटेजवळगा, जवळगा उपकेंद्रात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास २०० जणांवर उपचार करण्यात आले.

जवळग्याचे येथील सरपंच हनुमंत बिराजदार यांनी वलांडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकास बोलावून १०७ जणांवर उपचार करुन घेतले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात आली. अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे म्हणाले, आतापर्यंत ७० रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या पोटात दुखणे, उलटी, जुलाब असा त्रास होता. सर्वांची प्रकृती चांगली असल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तसेच सोमवारी सकाळी नवीन आणखी १० असे रूग्ण आले होते, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर