शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित !

By संदीप शिंदे | Updated: December 28, 2022 19:10 IST

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते.

- संदीप शिंदेलातूर : खरीप व रबी हंगामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली जाते. त्याअंतर्गत प्रत्येकी चार महिन्याला दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. मात्र, या अनुदानासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील ४८ हजार ४४० शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत इे-केवायसी केली नसल्याने हे शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ३ लाख ६ हजार ८८४ लाभार्थी असून, यापैकी २ लाख ५८ हजार ४४४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. याचे प्रमाण ८४ टक्के असून, अद्यापही १६ टक्के म्हणजेच ४८ हजार ४४० शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे हे शेतकरी दोन हजारांच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत.

ई-केवायसी म्हणजे काय...योजनेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यानुसार लाभार्थी ठरविण्यात आले आहेत. मात्र, आता या लाभार्थींना ई-केवायसी आवश्यक असून, त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबधित शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतात, याची माहिती मिळते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ई-केवायसी विविध योजनांसाठी फायदेशीर आहे.

१६ टक्के ई-केवायसी रखडली...जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के ई- केवायसीचे काम पूर्ण झाले असून, १६ लाभार्थींचे काम अद्यापही रखडले आहेत. दरम्यान, संबधित शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सुविधा केंद्रावर जाऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याशी आधार, पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. महसूल प्रशासनाच्या वतीनेही शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेकांनी याकडे पाठ फिरविली असल्याने लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

वर्षाला मिळतात सहा हजार रुपये...प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येते. जिल्ह्यात ३ लाख ६ हजार ८८४ लाभार्थी असून, यातील २ लाख ५८ हजार ४४४ लाभार्थींना चार महिन्याला अनुदान मिळते. तर ४८ हजार शेतकऱ्यांचे अनुदान ई-केवायसीअभावी रखडले आहे. त्यामुळे ई-केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी