शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित !

By संदीप शिंदे | Updated: December 28, 2022 19:10 IST

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते.

- संदीप शिंदेलातूर : खरीप व रबी हंगामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली जाते. त्याअंतर्गत प्रत्येकी चार महिन्याला दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. मात्र, या अनुदानासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील ४८ हजार ४४० शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत इे-केवायसी केली नसल्याने हे शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ३ लाख ६ हजार ८८४ लाभार्थी असून, यापैकी २ लाख ५८ हजार ४४४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. याचे प्रमाण ८४ टक्के असून, अद्यापही १६ टक्के म्हणजेच ४८ हजार ४४० शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे हे शेतकरी दोन हजारांच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत.

ई-केवायसी म्हणजे काय...योजनेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यानुसार लाभार्थी ठरविण्यात आले आहेत. मात्र, आता या लाभार्थींना ई-केवायसी आवश्यक असून, त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबधित शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतात, याची माहिती मिळते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ई-केवायसी विविध योजनांसाठी फायदेशीर आहे.

१६ टक्के ई-केवायसी रखडली...जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के ई- केवायसीचे काम पूर्ण झाले असून, १६ लाभार्थींचे काम अद्यापही रखडले आहेत. दरम्यान, संबधित शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सुविधा केंद्रावर जाऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याशी आधार, पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. महसूल प्रशासनाच्या वतीनेही शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेकांनी याकडे पाठ फिरविली असल्याने लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

वर्षाला मिळतात सहा हजार रुपये...प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येते. जिल्ह्यात ३ लाख ६ हजार ८८४ लाभार्थी असून, यातील २ लाख ५८ हजार ४४४ लाभार्थींना चार महिन्याला अनुदान मिळते. तर ४८ हजार शेतकऱ्यांचे अनुदान ई-केवायसीअभावी रखडले आहे. त्यामुळे ई-केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी