शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

१६ हजारपैकी ३ हजार शेतकऱ्यांनी केली हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबराेबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने, शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस अधिक ...

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबराेबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने, शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या १६ हजार १२३ पैकी केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली आहे. दरम्यान, आता बाजारपेठेतील दरात घसरण होत आहे.

गेल्या पावसाळ्यात अधिक पाऊस पडल्याने जलसाठे तुडुंब भरले होते. त्याचा लाभ खरीप हंगामासाठी झाला. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा यंदा ज्यादा पेरा झाला होता. त्याचबरोबर पिकांना पुरेसे पाणी मिळाल्याने उत्पादनही चांगले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केल्यानंतर विक्री करण्यास सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासून हरभऱ्याला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकही लाभ मिळाला.

केंद्र शासनाने हरभऱ्यास ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत जाहीर केली होती. जिल्ह्यातील १६ हजार १२३ शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून २४ फेब्रुवारीपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, बाजार समित्यांत हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवित बाजार समितीत हरभऱ्याची विक्री केली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ आधारभूत खरेदी केंद्रांवर आतापर्यंत केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून बाजार समितीतील हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी हरभऱ्याला ४ हजार ९०० ते ४ हजार ६६० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना किमान ५०० रुपयांपेक्षा अधिक फटका प्रति क्विंटलमागे बसत असल्याचे दिसून येत आहे.

४६ हजार क्विंटल हरभरा खरेदी...

यंदाच्या खरीप हंगामात हमीभाव खरेदी केंद्रांवर ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. खुल्या बाजारपेठेत अधिक दर राहिल्यामुळे यंदा कमी प्रमाणात हरभऱ्याची खरेदी झाली आहे, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.

विक्रीसाठी २४ मेपर्यंत मुदत...

ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावरून हरभरा विक्रीसाठी एमएमएस पाठविण्यात आले आहेत. सध्या बाजारपेठेत दर घसरल्याने शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर आपला हरभरा विक्री करावा. त्यासाठी २४ मेपर्यंत मुदत आहे. या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सुमठाणे यांनी केले आहे.