शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 16:52 IST

राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले.

लातूर : पंतप्रधान आपल्या भाषणातून देशाच्या अखंडतेविषयी सातत्याने बोलतात़ मात्र, उक्तीप्रमाणे कृती कोठेही दिसत नाही. याच सरकारमधील महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्र्यांना तर एकात्मता वाढीस लावणाऱ्या कार्यक्रमांसाठी वेळही नाही, अशी खंत व्यक्त करताना आता एकात्मता, देशाची अखंडता ही आपल्या सर्वांची जबाबदारी समजून देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे यायला हवे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी नेते तथा राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी रविवारी लातुरात व्यक्त केले.

राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. सुब्बाराव म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेच्या केवळ गप्पा मारुन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. भाषेच्या अस्मितेवरुन अनेक देशांचे तुकडे पडले आहेत. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, रशिया, आफ्रिकेचेही भाषा, धर्माच्या मुद्यावरुन तुकडे पडले आहेत. आपल्या देशात अनेक भाषा, जाती-धर्म अस्तित्वात असूनही आपण एकसंघ आहोत, हे जगासाठी आदर्श आहे. १९६२ साली आपल्या देशाच्या संरक्षणाचा खर्च ३०० कोटी होता. आजघडीला तो १ लाख ९८ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित असल्या तरी अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी आता इथल्या प्रत्येक नागरिकाला घ्यावीच लागणार आहे. केवळ बंदुकीच्या जोरावर देशाची अखंडता टिकणार नाही. त्यासाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. जात-धर्म-भाषेवरुन भांडणे होणार नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण सर्वजण ‘भारत की संतान’ आहोत, ही भावना रुजविणे गरजेचे आहे. यासाठीच बालमनात हे संस्कार रुजवून शांततेचा, एकतेचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील बालमने इथे एकवटल्याचे डॉ. सुब्बाराव म्हणाले.

जग जितके छोटे होत चालले आहे, तितकेच आता आपली हृदये माणसाला विशाल करावी लागणार आहेत. आचार्य विनोबांनी हे तेव्हाच जाणले होते. म्हणूनच त्यांनी ‘जय जगत्’चा नारा दिला. हा नारा, बापू अन् आचार्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाने उचलावी, असे आवाहनही डॉ. सुब्बाराव यांनी केले.

भारतच नव्हे तर भारमातेचीही वाटणीदेशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी जे काम सरकारने करायला हवे, ते काम राष्ट्रीय युवा योजनेच्या माध्यमातून डॉ़सुब्बाराव करीत आहेत़ जात-धर्मावरुन भारताची वाटणी करण्याचे काम हे सरकार करीत आले आहे़ आता तर भारतमातेचीही वाटणी सरकारकडून केली जात असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ़ अमित देशमुख यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :laturलातूरAmit Deshmukhअमित देशमुख