शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा

By हरी मोकाशे | Updated: December 6, 2023 17:47 IST

लातूर जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. परिणामी, सध्या व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे तर उर्वरित सहा प्रकल्पांमध्ये केवळ २१.८४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

गत पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने खरीपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिन्यापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शिवाय, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर विहिर, कुपनलिकांमध्ये पाण्याचा संचय झाला नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांसह प्रशासनाला अपेक्षा होती. परंतु, परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे आशेवर पाणी फिरले. परिणामी, पाणीटंचाईची भीती वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला.

जलसाठा घटू लागल्याने चिंता...दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला चिंता लागली आहे. सध्या तावरजा मध्यम प्रकल्पात ०.०६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच रेणापूर प्रकल्पात ४.०३८, देवर्जन- ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी - ७.०१७, मसलगा- ७.१७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. सध्या एकूण २६.६७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

तलावांमध्ये २२.९९ टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७२.२४६ दलघमी असून त्याची टक्केवारी २२.९९ टक्के अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात येत आहेत.

प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित...जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पातील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी करु नये म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच तालुका प्रशासन व महावितरणने प्रकल्पावर लक्ष देऊन विद्युत मोटारींद्वारे पाण्याचा शेतीसाठी वापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...प्रकल्प - उपयुक्त जलसाठा टक्केतावरजा - ०.३०व्हटी - ००रेणापूर - १९.६४तिरु - ००देवर्जन - ३२.४८साकोळ - ४४.९४घरणी - ३१.२३मसलगा - ५२.५३एकूण - २१.८४

टॅग्स :laturलातूरWaterपाणी