शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

लातूर/ अहमदपूर : यंदाच्या रबी हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ...

लातूर/ अहमदपूर : यंदाच्या रबी हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांना हरभरा विक्री करता आला नाही. त्यातच बाजारपेठेत दरही घसरले होते. त्यामुळे मुदतवाढीची मागणी होत होती. केंद्र सरकारने २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जलसाठे भरले होते. त्यामुळे यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता. तसेच उत्पादनही चांगले मिळाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यात अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राऐवजी बाजार समित्यांत हरभऱ्याची विक्री करण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यातील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एकूण १६ हजार १२३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु, २५ फेब्रुवारीपासून गत आठवड्यापर्यंत प्रत्यक्षात केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. बाजार समितीत अधिक दर असल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. दरम्यान, गत आठवड्यापासून अचानकपणे हरभऱ्याच्या दरात घसरण होऊ लागली. प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना ३०० ते ४०० रुपयांचा फटका बसू लागल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळू लागले. परंतु, २५ मे पर्यंतच मुदत असल्याने आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येऊ लागली होती. मंगळवारी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.

मुदतवाढीसाठी पाठपुरावा...

लॉकडाऊन आणि बाजारपेठेतील घसरलेले दर पाहून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन आ. बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करुन पाठपुरावा सुरु केला होता. अखेर एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२४ कोटींचा हरभरा खरेदी...

यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यातील १६ केंद्रांवर गत आठवड्यापर्यंत ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ कोटी वर्ग करण्यात आले आहेत. आता एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून २५ जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू राहणार असल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.