शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अनुदानासह योजनांचा लाभ मिळेना; संतप्त शेतकऱ्यांच्या कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

By हरी मोकाशे | Updated: November 2, 2022 16:38 IST

बेलकुंड व परिसरातील कृषी विभागाचे काम ठप्प झाले आहे.

औसा (जि. लातूर) : येथील तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांत समन्वय नाही. तसेच कार्यालयीन वेळेतही अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार खेटे मारावे लागतात. दरम्यान, बेलकुंड मंडळास सहा महिन्यांपासून कृषी सहाय्यक नसल्याने अनुदानासह इतर योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी बेलकुंड येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

तालुक्यातील बेलकुंडच्या कृषी सहाय्यकास येथील अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे बेलकुंड व परिसरातील कृषी विभागाचे काम ठप्प झाले आहे. परिणामी, अनुदानाच्या याद्यांसह पीकविमा, पंचनामे आदी कामे वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत ठिय्या मांडला.

यावेळी सरपंच विष्णू कोळी, शकिल शेख, व्यंकट सांळुके, नानासाहेब निकते, संदीपान हलकरे, मैनोद्दीन पठाण, अशोक जाधव, मैनोद्दीन पठाण, भीमराव शिंदे, दत्तू पवार, पांडुरंग सिरसाट, इरशाद पठाण आदींचा समावेश होता.

अतिरिक्त पदभारातून कृषी सहाय्यक मुक्त...तालुका कृषी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करताच कृषी सहाय्यक ए.आर. काळदाते यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आले. त्यासंदर्भातील पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलनFarmerशेतकरी