शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात

By हरी मोकाशे | Updated: January 4, 2024 17:30 IST

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत.

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक भाव असल्याने राज्य शासनाने यंदा ‘नाफेड’मार्फत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवस उलटले तरी एक रुपयाची खरेदी झाली नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी खुल्या बाजारास पसंती दिली आहे. त्यामुळे आधारभूत किंमत योजनेंतर्गतच्या हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झाली नाही. हे पाहून राज्य शासनाने यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले.

जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा ६४ हजार ४६३ हेक्टरवर पेरा झाला होता. सध्या काही ठिकाणी तूर काढणी सुरू असून, शेतकरी बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत.

२३ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणीतूर विक्री नोंदणीसाठी ‘नाफेड’ने जिल्ह्यात सहा केंद्रांना मंजुरी दिली आहे. २२ डिसेंबरपासून विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत औसा तालुक्यातील केंद्रावर १०, देवणी ३, लातूर ४, रेणापूर १ आणि सताळा (ता. अहमदपूर) येथील केंद्रावर ५ अशा एकूण २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, अद्यापही नोंदणी सुरूच असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन वर्षांपासून रुपयाची खरेदी नाही...गेल्या तीन वर्षांपासून नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एक रुपयाचीही तूर खरेदी झाली नाही. कारण, हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

वर्षाला तीनशे रुपयांची वाढ...वर्ष - हमीभाव२०२०-२१ - ६०००२०२१-२२ - ६३००२०२२-२३ - ६६००२०२३- २४ - ७०००

मुंबईहून कळणार दररोजचा भाव...यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, तीन दिवसांत एकाही शेतकऱ्याने तूर विक्री केली नाही. दरम्यान, तुरीचा दररोजचा भाव हा नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून कळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.-विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

गरजेवेळी पैसे मिळण्यास अडचण...बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा नाफेडचा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील. मात्र, हमीभाव केंद्रावर शेतमालाची विक्री केल्यानंतर काही दिवसांनी पैसे मिळतात. गरजेवेळी पैसे मिळत नाहीत. आर्थिक अडचणींतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे अडचण होते.-विलास देशमाने, शेतकरी.

८ हजार ७०० रुपये सर्वसाधारण भाव...लातूर बाजार समितीत बुधवारी तुरीची १२ हजार १३१ क्विंटल आवक झाली होती. कमाल भाव ९ हजार २०० रुपये, किमान ७ हजार ९९९ रुपये, तर सर्वसाधारण ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर