शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नीट : लातूरच्या २ शिक्षकांसह नांदेड, दिल्लीच्या दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 06:44 IST

मोबाइलवर हॉलतिकीट, आर्थिक व्यवहारांचे संदर्भ; एकाला घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच देगलूर (जि. नांदेड) व दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नीटप्रकरणी महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. शनिवारी दोन शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार काही आरोपींच्या मोबाईलवर हॉलतिकिट व आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे चौघांविरूद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. 

नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (रा. लातूर), जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चौघांविरोधात केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात जलीलखॉ उमरखान पठाण (रा. लातूर) याला पोलिसांनी रविवारी उशीरा रात्री ताब्यात घेतले आहे.

प्रश्न विचारले, सोडून दिले...ज्या दोन शिक्षकांवर आरोप आहेत, त्यातील एकाने व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले. पथक आमच्याकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्याने सांगितले. 3 नेऊन आमची चौकशी केली. काही प्रश्न विचारले. त्यानंतर आम्हाला घरी सोडून दिले असल्याचे

'सीबीआय'ची खास पथके बिहार, गुजरातला दिल्ली नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांकडून देशव्यापी आंदोलने सुरू असताना 'सीबीआय'ने या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत 'सीबीआय'ने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गोध्रा आणि पाटणा येथे पाठविण्यात आली. कट, फसवणूक, तोतयागिरी, विश्वासघात आणि उमेदवार, संस्था व मध्यस्थांकडून पुरावे नष्ट करणे, यासह व्यापक तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयाने 'सीबीआय'ला केली आहे. 'सीबीआय'ने आयपीसी १२०-बी (गुन्हेगारी कट) व ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

किती जणांनी दिली फेरपरीक्षा?पूर्वी ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ विद्यार्थ्यांपैकी ८१३ विद्यार्थ्यांनी रविवारी पुन्हा परीक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ७ केंद्रांवर फेरपरीक्षा झाली. बिहारमधील केंद्रांवर ५ मे रोजी परीक्षेला बसलेल्या १७ विद्यार्थ्यांना एनटीए ने प्रतिबंधित केले. एजन्सीने यापूर्वी ६३ उमेदवारांना परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल प्रतिबंधित केले होते. 

आता नीट-पीजीदेखील पुढे ढकलली आहे. या सरकारच्या राजवटीत उध्वस्त झालेल्या शिक्षणव्यवस्थेचे हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण आहे. पेपर लीक करणारी टोळी आणि शिक्षण माफिया यांच्यासमोर सरकार हतबल आहे. - खासदार राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :laturलातूरNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल