शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन गरजेचे : पवन लड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:35 IST

आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़

ठळक मुद्देबदललेल्या व चुकीच्या आहारामुळे विविध शारिरिक आजारांची उत्पत्ती होत आहे.दररोजच्या आहारातील सातत्य टाळुन प्रत्येक वेळी नवीन पदार्थ खाणे अपेक्षित होय.

लातूर : सद्य परिस्थितीमध्ये बदललेल्या व चुकीच्या आहारामुळे विविध शारिरिक आजारांची उत्पत्ती होत आहे. प्रत्येक घरामध्ये वाढलेल्या वजनाशी संबंधीत रुग्ण आढळुन येत आहेत. असे आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़ असा सल्ला डॉ.पवन लड्डा यांनी दिला.  

वजन व आहार यावर माहिती देताना डॉ. लड्डा यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी आहार कमी व व्यायाम जास्त हा नियम काटेकोरपणे लागू होतो. मात्र आहार कमी म्हणजे किती व कोणता घ्यावा, आहार नियंत्रण कसे करावे, व्यायाम कसा करावा, योग्य व्यायाम कोणता याबद्दल द्विधा मन:स्थिती असते.  शरिराला गरज आहे तितकाच आहार घेणे आवश्यक आहे़ त्यात  आग्रहाचे जेवण टाळणे, भुक नसताना जेवण करणे टाळणे, पूर्वी खाल्लेले अन्न पचन झाले नसताना फक्त वेळ झाली म्हणुन खाणे टाळणे म्हणजेच आहारावर नियंत्रण करणे असे होते़

पूर्वी मेहनतीची कामे खुप असायची. भरपुर कष्ट केल्यानंतर पोट भरुन खाल्ले तरीही वजन वाढत नव्हते. आता शारिरिक कष्ट अत्यंत कमी झाले आहे. चालणे फिरणे कमी झाले आहे, अंग मेहनत नाहीशी झाली आहे, लोकांना मेहनत किंवा धावपळ करुन घाम कधी आला होता हे नीट आठवत नाही़ यामुळे पोटभरून खाणे ही संकल्पना कालबाह्य होणे गरजेचे आहे. एका वेळेस फक्त भाकरी-वरण, दुसरे काहीच नाही, एका वेळेस फक्त चपाती भाजी दुसरे काही नाही, एका वेळेस फक्त कोशींबीर किंवा कोशींबीर- चपाती, पुढच्या वेळेस फक्त भात-वरण, याप्रमाणे खिचडी-कढी, कडधान्यांची उसळ, फळे, फळांचा रस किंवा पालेभाज्यांचे सुप्स, चुरमुरयाचा चिवडा किंवा भेळ, सुकामेवा, ताक किंवा मठ्ठा, मुगाची किंवा तुरीची डाळ याप्रमाणे आठवड्याचे सकाळ-दुपार-संध्याकाळ असे नियोजन करायचे.  आहार बदल म्हणजे दररोजच्या आहारातील सातत्य टाळुन प्रत्येक वेळी नवीन पदार्थ खाणे अपेक्षित होय.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना आपल्याला सहज जमेल, सोसवेल, नेहमी करता येईल असा व्यायाम करावा. ज्या व्यायामामुळे प्रभावीरित्या वजन कमी होते असा व्यायाम करावा. व्यायामाला आपल्या दैनंदिनीमध्ये सर्वात महत्वाचे स्थान द्यावे. व्यायाम  करताना घाम येणे महत्वाचे, व्यायाम करताना मुद्दाम दम लागणे महत्वाचे, श्वासाचा वेग वाढणे महत्वाचे, हृदयाचे ठोके वाढणे महत्वाचे. एकंदरीत आपण करीत असलेल्या व्यायामाने एका निश्चित प्रमाणात कॅलरीज बर्न होणे आवश्यक असल्याचेही डॉ. पवन लड्डा म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल