शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन गरजेचे : पवन लड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:35 IST

आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़

ठळक मुद्देबदललेल्या व चुकीच्या आहारामुळे विविध शारिरिक आजारांची उत्पत्ती होत आहे.दररोजच्या आहारातील सातत्य टाळुन प्रत्येक वेळी नवीन पदार्थ खाणे अपेक्षित होय.

लातूर : सद्य परिस्थितीमध्ये बदललेल्या व चुकीच्या आहारामुळे विविध शारिरिक आजारांची उत्पत्ती होत आहे. प्रत्येक घरामध्ये वाढलेल्या वजनाशी संबंधीत रुग्ण आढळुन येत आहेत. असे आजार टाळण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे़ असा सल्ला डॉ.पवन लड्डा यांनी दिला.  

वजन व आहार यावर माहिती देताना डॉ. लड्डा यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी आहार कमी व व्यायाम जास्त हा नियम काटेकोरपणे लागू होतो. मात्र आहार कमी म्हणजे किती व कोणता घ्यावा, आहार नियंत्रण कसे करावे, व्यायाम कसा करावा, योग्य व्यायाम कोणता याबद्दल द्विधा मन:स्थिती असते.  शरिराला गरज आहे तितकाच आहार घेणे आवश्यक आहे़ त्यात  आग्रहाचे जेवण टाळणे, भुक नसताना जेवण करणे टाळणे, पूर्वी खाल्लेले अन्न पचन झाले नसताना फक्त वेळ झाली म्हणुन खाणे टाळणे म्हणजेच आहारावर नियंत्रण करणे असे होते़

पूर्वी मेहनतीची कामे खुप असायची. भरपुर कष्ट केल्यानंतर पोट भरुन खाल्ले तरीही वजन वाढत नव्हते. आता शारिरिक कष्ट अत्यंत कमी झाले आहे. चालणे फिरणे कमी झाले आहे, अंग मेहनत नाहीशी झाली आहे, लोकांना मेहनत किंवा धावपळ करुन घाम कधी आला होता हे नीट आठवत नाही़ यामुळे पोटभरून खाणे ही संकल्पना कालबाह्य होणे गरजेचे आहे. एका वेळेस फक्त भाकरी-वरण, दुसरे काहीच नाही, एका वेळेस फक्त चपाती भाजी दुसरे काही नाही, एका वेळेस फक्त कोशींबीर किंवा कोशींबीर- चपाती, पुढच्या वेळेस फक्त भात-वरण, याप्रमाणे खिचडी-कढी, कडधान्यांची उसळ, फळे, फळांचा रस किंवा पालेभाज्यांचे सुप्स, चुरमुरयाचा चिवडा किंवा भेळ, सुकामेवा, ताक किंवा मठ्ठा, मुगाची किंवा तुरीची डाळ याप्रमाणे आठवड्याचे सकाळ-दुपार-संध्याकाळ असे नियोजन करायचे.  आहार बदल म्हणजे दररोजच्या आहारातील सातत्य टाळुन प्रत्येक वेळी नवीन पदार्थ खाणे अपेक्षित होय.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना आपल्याला सहज जमेल, सोसवेल, नेहमी करता येईल असा व्यायाम करावा. ज्या व्यायामामुळे प्रभावीरित्या वजन कमी होते असा व्यायाम करावा. व्यायामाला आपल्या दैनंदिनीमध्ये सर्वात महत्वाचे स्थान द्यावे. व्यायाम  करताना घाम येणे महत्वाचे, व्यायाम करताना मुद्दाम दम लागणे महत्वाचे, श्वासाचा वेग वाढणे महत्वाचे, हृदयाचे ठोके वाढणे महत्वाचे. एकंदरीत आपण करीत असलेल्या व्यायामाने एका निश्चित प्रमाणात कॅलरीज बर्न होणे आवश्यक असल्याचेही डॉ. पवन लड्डा म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल