शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

शालेय पोषण आहाराला हवीय आधार जोडणी; अपुऱ्या केंद्रामुळे जुळणार कशी फोडणी?

By संदीप शिंदे | Updated: August 25, 2022 17:43 IST

लातूर जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळेना

संदीप शिंदेलातूर :शिक्षण संचालनालयाच्या सुचनेनुसार शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळांकडून पोषण आहारासाठी मागविण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात १ लाख ३०५ विद्यार्थ्यांनी अद्यापही आधार कार्ड दिलेले नाही. त्यातच जिल्ह्यात आधार कार्ड काढण्यासाठी केवळ ५५ मशीन असून, त्यावर एक दिवसात केवळ ४० जणांचे आधार कार्ड काढता येते. परिणामी, अपुऱ्या मशिनमुळे पालक, विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

शालेय पोषण आहारासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना सूचना करण्यात आल्या असून, शिक्षकही पालकांकडे मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी तगादा लावत आहे. मात्र, तालुक्याच्या ठिकाणी केवळ एक ते दोन आधार केंद्र आहेत. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अर्जात वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याने पालकांची हेळसांड होत आहे.

जिल्ह्यात ४ लाख ८४ हजार ६५८ विद्यार्थी असून, यापैकी ३ लाख ८४ हजार ३५३ जणांनी शाळेत आधार जमा केले आहे. तर १ लाख ३०५ विद्यार्थ्यांनी अद्यापही आधार दिलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या प्रमाणे आधार कार्ड जमा करण्यासाठी सक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळा किंवा केंद्रस्तरावर आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शिक्षकांमधूप होत आहे.

पाच दिवसांपासून आधारसाठी धावपळ...मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी पाच दिवसांपासून औसा येथे येत आहे. मात्र, अर्जात त्रुटी सांगण्यात येत असून, पुढील महिन्यात बोलावले आहे. शेतीची कामे सोडून आधारासाठी यावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. शाळास्तरावर सुविधा उपलब्ध करून द्यावी. - बालाजी कंगले, पालक

शाळास्तरावर सुविधा उपलब्ध करावी...प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकच मशीन आहे. ग्रामीण भागातून आधार काढण्यासाठी पालकांना तीन ते चार दिवस लागत असल्यामुळे पालकांची विद्यार्थ्यांची व शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. - महादेव खिचडे, तालुकाध्यक्ष, शिक्षक संघ

जिल्ह्यात केवळ ५५ आधार केंद्र...जिल्ह्यात ५५ ठिकाणी आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना गावावरुन तालुक्याला चकरा माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे या आधार केंद्रावर जुनाच सेटअप असल्याने एका दिवसात केवळ ४० जणांचे आधार कार्ड काढता येते. परिणामी, पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

आधार कार्डासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन...शाळांनी ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. १ जानेवारीपासून ज्या विद्यार्थ्यांचे आधार नाही. त्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे आधारसाठी शिक्षकांसह पालकांचीही धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीlaturलातूर