शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरातील नांदेड-बिदर मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा ...

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भिजपाऊस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे रहदारीच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाकडून मुरूम व सीलकोट टाकून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र या पावसात ते वाहून गेले असून पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून हा वर्दळीचा राज्यमार्ग गेला असल्याने नेहमी या रस्त्यावर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणच्याच रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सामान्य जनता त्रस्त झाली असून संबंधित विभागावर संताप व्यक्त करीत आहे. सदरील राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करून रस्त्यावर थांबून राहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व शहरातील नागरिकांनी केली आहे.

अंतर्गत रस्त्यावर ही खड्डेच खड्डे...

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. नाली व ड्रेनेजची अनेक ठिकाणी सोय नाही. मुख्य रस्त्याला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. तर शहरातील अंतर्गत रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केली आहे.

पावसामुळे वाढला अपघाताचा धोका...

सध्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.