शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

उदगीरातील नांदेड-बिदर मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा ...

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भिजपाऊस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे रहदारीच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाकडून मुरूम व सीलकोट टाकून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र या पावसात ते वाहून गेले असून पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून हा वर्दळीचा राज्यमार्ग गेला असल्याने नेहमी या रस्त्यावर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणच्याच रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सामान्य जनता त्रस्त झाली असून संबंधित विभागावर संताप व्यक्त करीत आहे. सदरील राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करून रस्त्यावर थांबून राहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व शहरातील नागरिकांनी केली आहे.

अंतर्गत रस्त्यावर ही खड्डेच खड्डे...

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. नाली व ड्रेनेजची अनेक ठिकाणी सोय नाही. मुख्य रस्त्याला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. तर शहरातील अंतर्गत रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केली आहे.

पावसामुळे वाढला अपघाताचा धोका...

सध्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.