शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

उदगीरातील नांदेड-बिदर मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा ...

उदगीर : शहरातील नांदेड-बिदर या राज्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागातून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग गेला आहे. या राज्यमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. उमा चौक, नांदेड नाका व पुढे उदय पेट्रोल पंप या भागातील या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भिजपाऊस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे रहदारीच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाकडून मुरूम व सीलकोट टाकून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र या पावसात ते वाहून गेले असून पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून हा वर्दळीचा राज्यमार्ग गेला असल्याने नेहमी या रस्त्यावर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणच्याच रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सामान्य जनता त्रस्त झाली असून संबंधित विभागावर संताप व्यक्त करीत आहे. सदरील राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करून रस्त्यावर थांबून राहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व शहरातील नागरिकांनी केली आहे.

अंतर्गत रस्त्यावर ही खड्डेच खड्डे...

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. नाली व ड्रेनेजची अनेक ठिकाणी सोय नाही. मुख्य रस्त्याला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. तर शहरातील अंतर्गत रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केली आहे.

पावसामुळे वाढला अपघाताचा धोका...

सध्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.