शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे अल्पभूधारक होणार भूमिहीन!

By हरी मोकाशे | Updated: March 29, 2024 16:07 IST

मुरुड अकोल्याच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे आक्षेप

लातूर : पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून जात आहे. त्यासाठी भूसंपादन होणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहिन होणार आहेत. परिणामी, या महामार्गाबद्दल मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या आहेत.

पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रूतगती महामार्ग (विशेष क्र. १०) हा होणार आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील २१ गावांच्या हद्दीतील शिवारातून जाणार आहे. त्यात लातूर तालुक्यातील मुरुड अकोला गावाचाही समावेश आहे. त्यासाठी आगामी काळात भूसंपादन होणार आहे. दरम्यान, या महामार्गासंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत.प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सध्याच्या जमिनी ह्या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहेत. विशेषत: जमिनी ह्या यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास आम्ही अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते.

विशेष म्हजणे, काही जमिनी ह्या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर आमच्या जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित केल्यास आमचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आमच्या जमिनी संपादित करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदवावर केदारनाथ बिडवे, श्रीमंत बिडवे, उत्तरेश्वर गिराम, जयश्री गिराम, लिंबाबाई गिराम, कलावती बनाळे, सोमेश्वर बिडवे, रामभाऊ शेळके, जयलिंग बिडवे, धनराज कुर्डे, संतोष तोडकर, श्रीपती बिडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :laturलातूरhighwayमहामार्ग