शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांच्या डिजिटल शिक्षणाला महावितरणचा शॉक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 15:34 IST

वाडी, तांड्यांवरून शाळेत पोहोचण्यासाठी मुलींना एकीकडे एसटीचा प्रवास मोफत आहे. ज्याद्वारे डबघाईला आलेले एसटी महामंडळ  शिक्षणाच्या उत्कर्षाला एकप्रकारे पाठबळ देत आहे. मात्र, कंपनीकरण

धर्मराज हल्लाळे

वाडी, तांड्यांवरून शाळेत पोहोचण्यासाठी मुलींना एकीकडे एसटीचा प्रवास मोफत आहे. ज्याद्वारे डबघाईला आलेले एसटी महामंडळ  शिक्षणाच्या उत्कर्षाला एकप्रकारे पाठबळ देत आहे. मात्र, कंपनीकरण  झालेले महावितरण थकबाकीच्या कारणावरून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची वीज विनाविलंब बंद करीत आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांचा आढावा ‘लोकमत’ने घेतला. त्या जिल्ह्यांमध्ये जवळपास २ हजार ३७३ शाळा अंधारात आहेत. कारण वीजबिल भरलेले नाही. त्यात शिक्षण विभागाची उदासिनता हे प्रमुख कारण आहे. एकंदर  सरकारचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन दर्शविणारे हे जिवंत उदाहरण आहे. एकीकडे डिजिटल शाळा केल्या जात आहेत. अनेक प्रयोगशील शिक्षकांनी स्वकष्टातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. त्यांना गावकऱ्यांची साथ मिळते. लोकवर्गणीतून काही शाळा सुस्थितीत आहेत. परंतू प्रत्येक ठिकाणी लोक स्वत:च्या खिशातून शाळेला मदत करतील, हे शक्य नाही. एकतर लोकांना तसे प्रवृत्त करण्यासाठी प्रबोधन केले पाहिजे. अन्यथा शाळांची वीज बंद होणार नाही, ही जबाबदारी सरकारने अर्थात शिक्षण विभागाने घेतली पाहिजे. शिवाय, महावितरणनेही आपली व्यावसायिक भूमिका थोडी लवचिक केली पाहिजे. शाळांनाही व्यावसायिक दराने वीजबिल दिले जाते. गेली अनेक वर्षे मागणी आहे, शाळांना घरगुती दरांप्रमाणे बिल द्यावे. परंतू महावितरण कंपनी ऐकत नाही. चर्चा झाल्या आहेत. अंमलबजावणी होत नाही. परिणामी, राज्यातील हजारो शाळा अंधारात आहेत. एकवेळ अशी होती की, वीज असली काय अन् नसली काय शाळेला फरक पडत नव्हता. आता शाळांमध्ये सुविधा वाढल्या आहेत. संगणकीकरण करण्याचा रेटा प्रशासनाचा आहे. शाळा डिजीटल झाल्या पाहिजेत हा आग्रह आहे. किंबहुना त्या झाल्याच पाहिजेत. परिणामी, पूर्वीच्या तुलनेत शाळांचे वीजबील वाढू लागले आहे. अनेकांनी प्रोजक्टर घेतले आहेत. डिजीटल शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. स्वाभाविकच बील वाढत आहे. मात्र हा खर्च नसून गुंतवणूक आहे, हे शिक्षण विभागाच्या ध्यानी आले पाहिजे. महावितरणनेही घरगुती दर देऊन थोडी कळ सोसली पाहिजे.दिल्लीत शासकीय शाळांचे जाळे मजबूत केले जात आहे. अर्थात अर्थसंकल्पामध्ये शाळांच्या सुविधांवर आम्हालाही दिल्लीच्या धर्तीवर अधिकची तरतूद करावी लागेल. जिल्हा परिषदा जितका खर्च रस्ता बांधणीवर करतात, तितका खर्च शिक्षणावर करू इच्छित नाहीत. हे आश्चर्य आहे. काही जिल्हा परिषदांनी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी शाळांचे वीजबील भरण्यासाठी उपयोगात आणला आहे. किमान ही उपाययोजना  तत्काळ अंमलात आली पाहिजे.

 

शासनाचे वेतनेत्तर अनुदान बंद आहे. जे कधीकाळी ४ टक्के मिळत होते. खाजगी शाळा तर अधांतरी आहेत. तिथे खर्च भागविण्याची कसरत आहे. जिथे अर्थपूर्ण व्यवहार आहेत, तिथे संस्था समर्थ आहेत. अन्य ठिकाणी कसे काय चालविले जाते, हा मोठा प्रश्न आहे. त्यात जिल्हा परिषद शाळा ही शासनाची जबाबदारी आहे़ काही ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षक वर्गणी करून विजबील भरतात. शाळांमध्ये सुविधा करतात. लोकही मदत करतात. मात्र ज्या गावांमध्ये संवाद नाही अथवा जी गावे लोकसंख्येने मोठी आहेत, तिथे खर्च कुणी करायचा हा प्रश्न उभारतो. गेल्या अनेक महिन्यांचे बील थकले आहे. त्यामुळे महावितरणनेही आपला कारवाईचा शॉक देऊन डिजीटल शिक्षणाला ब्रेक लावला आहे.

 

शिक्षक गुणवान आहेत परंतु, शिक्षण दर्जेदार द्यायचे असेल तर उत्तम सुविधा लागतील. त्यातही वीज गरजेची आहे. त्याशिवाय डिजीटलची अंमलबजावणी होणार नाही. शासनाचे आदेश कागदावर राहतील. अपेक्षा मोठ्या करायच्या आणि सुविधा काढून घ्यायच्या हे परवडणार नाही. त्यामुळे शिक्षण व उर्जा विभागाने एकत्र येऊन तातडीने शाळांचा वीजपुरवठा व्यावसायिक निकषातून बाहेर काढला पाहिजे. वीजबिल सवलतीच्या दरात दिले पाहिजे.अन् दिलेले बील भरण्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळा