शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी जळकोटातील ७३० कुटुंबांना मिळाला आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST

जळकोट : निवारा नसलेल्यांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर रहावे म्हणून शासनाच्यावतीने विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ...

जळकोट : निवारा नसलेल्यांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर रहावे म्हणून शासनाच्यावतीने विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत तालुक्यात सन २०१७ ते २०२१ या कालावधीत एकूण १ हजार १० घरकुलांना मंजुरी मिळाली. दरम्यान, त्यातील ७३० घरांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे पावसाळ्यात होणारी अडचण दूर झाली आहे.

ज्या कुटुंबास राहण्यासाठी पक्के घर नाही, अशांसाठी पंतप्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून सदरील कुटुंबांना घर बांधकामासाठी १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कमी- जास्त प्रमाणात अनुदान दिले जाते. जळकोट तालुक्यात सन २०१७ ते २०२१ या कालावधीत एकूण १ हजार १० घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १ हजार ८ लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामास सुरुवात केल्याने त्यांना पहिला हप्ता देण्यात आला. त्यातील ७३० लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाल्याने लाभार्थ्यांची होणारी परवड थांबणार आहे. दरम्यान, २८० घरकुलांची बांधकामे वाळूअभावी रखडली आहेत. वाळू उपलब्ध होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दरम्यान, सदरील लाभार्थ्यांची अडचण पाहून शासनाच्या आदेशाचा आधार घेत गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदरील लाभार्थ्यांना घरकुलासाठी काही प्रमाणात वाळू उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव सादर केला होता; मात्र सदरील लाभार्थ्यांना अद्यापही वाळू उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही या लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

५ ब्रास मोफत वाळू द्यावी...

प्रशासनाने घरकुल बांधकामासाठी मोफत ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी. शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलासाठीच्या अनुदानाच्या रकमेतील तफावत दूर करावी, अशी मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, खादरभाई लाटवाले, गोपाळकृष्ण गबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेटे, प्रशांत देवशेट्टे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, मनोहर वाकळे, शिरीष चव्हाण, संग्राम नामवाड, अनिल गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, सत्यवान पांडे, बालाजी सूर्यवंशी, अजीजभाई मिस्त्री, आयुब शेख, बालाजी गवळी यांनी केली आहे.

८ कोटी ७६ लाखांचे खर्च...

सदरील घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत ८ कोटी ७६ लाखांचा खर्च झाला आहे. गोरगरिबांना पावसाळ्यापूर्वी हक्काचा निवारा मिळावा म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रयत्न करून संबंधिताना निर्देश दिले. त्यामुळे गरिबांना आधार मिळाला आहे.