शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मिशन बाला ५०० देणार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ‘प्रेरणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : विद्यार्थी चार भिंतीबाहेर जास्त वेळ फक्त शाळेतच राहात असतो. त्यामुळे केवळ शालेय परिसरच स्वच्छ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : विद्यार्थी चार भिंतीबाहेर जास्त वेळ फक्त शाळेतच राहात असतो. त्यामुळे केवळ शालेय परिसरच स्वच्छ असून चालत नाही, तर शाळेचे बाह्यांग - अंतरंगही सुंदर आणि शैक्षणिक प्रेरणा देणारे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीईओ अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुंदर, स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आनंददायी शिक्षणाअंतर्गत ‘बाला’ (बिल्डिंग ॲज लर्निंग एड) हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रारंभी २०२० - २१ मध्ये बाला उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांची निवड करण्यात आली. यापैकी काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच शाळांचे मूल्यांकनही केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य स्रोत शाळेची इमारत आणि शालेय परिसर आहे. पाठ्यपुस्तकांच्या जगात वावरत असताना मुलांना हसत - खेळत व कृतियुक्त शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या चौकोनी, आयताकृती भिंती, गोल गट्टे, वर्गातील कोपरे, वर्गाच्या चौकटी, दरवाजे, पायऱ्या, झाडांचे बूड, वर्गाचा छत, पिलर्स, संरक्षक भिंती आदी भौतिक साधनांचा उपयोग रंगरंगोटीच्या माध्यमातून वेगवेगळे भौमितिक आकार, कोनमापक, मोजपट्टी, वर्तुळ, विविध प्रकारच्या कोनांच्या आकृत्या याशिवाय, भाषा, भूगोल आदी विषयांचे मूळ ज्ञान विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने देता यावे, यासाठी साकारले जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना उपक्रमाच्या तयारीसाठी हा काळ उपयोगात आणला गेला. दरम्यान, जिल्ह्यातील पाचशे शाळांची निवड यासाठी झाली असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर राहणार आहे.

तालुका निवड झालेल्या शाळा

लातूर ७०

रेणापूर ३५

औसा ६०

निलंगा ६०

शिरूर अ. ३५

देवणी ३५

उदगीर ६०

जळकोट ३५

अहमदपूर ६०

चाकूर ५०

१ जुलैपासून होणार मूल्यांकन...

बाला अर्थात इमारत एक शैक्षणिक साधन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शाळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार असून, बांधकाम ३० गुण, रंगरंगोटी १०, शालेय परिसर १०, तर समाज सहभाग ३० गुण, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी २० असे १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. १ जुलैपासून तालुकास्तरीय समितीमार्फत शाळांना भेटी देण्यात येणार आहेत.

शालेय मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळणार आकार

या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसराचा कायापालट केला जाणार आहे. पाठ्यपुस्तकांसोबतच कृतियुक्त शिक्षण देण्याचा मानस या उपक्रमात आहे. वर्ग खोलीमध्ये अभ्यासपूर्ण रंगरंगोटीसोबतच शाळेच्या परिसरातही अभ्यासात्मक संकल्पना साकारल्या जाणार आहेत. ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईलच. सोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल.