शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली ‘लाॅक’;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

राजकुमार जाेंधळे । लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील ...

राजकुमार जाेंधळे ।

लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये बेपत्ता हाेण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, काेराेनाने अनेकांना घरातच जायबंदी केले आहे. २०१८ मध्ये १०१ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नाेंद जिल्ह्यातील त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या दप्तरी आहे. आता २०२० मध्ये हीच आकडेवारी ९३ च्या घरात आली आहे.

लातूर जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पाेलीस दलाच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध जाहीर करण्यात आले. या निर्बंधांना अधून-मधून शिथिलता देण्यात आली. परिणामी, याच काळात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. २०१८ मध्ये एकूण १०१ मुली बेपत्ता झाल्या असून, त्यातील ९९ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. तर २ मुलींचा शाेध लागला नाही. २०१९ मध्ये ९६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील ८२ मुलींचा शाेध लागला असून, १४ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. २०२० मध्ये एकूण ९३ मुली बेपत्ता असून, ८२ मुली सापडल्या आहेत. तर ११ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. जानेवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुली बेपत्ता असल्याचे समाेर आले आहे. यातील ४२ मुलींचा शाेध लागला असून, १६ मुली अजूनही बेपत्ता आहेत.

काेराेना काळात नियमांचे पालन व्हावे, यासाठी पाेलीस दल २४ तास कर्तव्यावर आहे. या काळात बेपत्ता झालेल्या बहुतांश मुलींचा शाेध लावण्यात आम्हाला यश आले आहे. हे प्रमाण जवळपास ८० ते ९० टक्क्यांच्या घरात आहे. यातील काही घटनात प्रेमप्रकरण हे कारण समाेर आले आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात स्वतंत्र अपहरणाचे गुन्हे दाखल असून, शाेधकार्य मात्र ८० टक्क्यांवर यशस्वी झाले आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

८५ टक्के मुलींचा शाेध लावण्यात आले यश...

२०१८ मध्ये एकूण १०१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. यातील ९९ मुलींचा शाेध लागला असून, याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर आहे. केवळ २ टक्के मुलींचा शाेध अद्यापही सुरु आहे. २०१९ पासून अपहरण झालेल्या ९६ मुलींपैकी ८२ मुलींचा शाेध लागला आहे. हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे़ २०२० मध्ये तब्ब्ल ९३ मुली बेपत्ता,अपहरण झाले आहे. यातील ८२ मुलींचा शाेध लागला आहे. तर ११ मुलींचा पत्ताच लागला नाही. ही टक्केवारी ८५ टक्क्यांच्या घरात आहे. जाेनवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुलीं बेपत्ता झाल्या असून, ४२ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. उर्वरित १६ मुलींचा शाेध अद्यापही सुरुच आहे़ हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे. २०१८ पासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलींचा शाेध सुरुच आहे.

शाेधकार्यासाठी पाेलीस पथकांची नियुक्ती...

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर, तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाताे. तपासाची चक्रे गतिमान केली जातात. विशेष म्हणजे, एखादा धागा हाती लागला की शाेध घेणे अधिक सुलभ हाेते. बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून राहत नाहीत. काेणाला न सांगताही जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते़;मात्र ज्यांना सांगून जातात, संपर्कात असतात, त्या व्यक्तीने पाेलिसांना तातडीने माहिती दिली तर शाेध लावण्यात अडचणी येत नाहीत. यावर कधी-कधी उपाय म्हणून पाेलीस खाक्या दाखवावा लागताे.