शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

By संदीप शिंदे | Updated: September 5, 2022 17:08 IST

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे

निलंगा (जि. लातूर): तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मसलगा प्रकल्प ९७ टक्के भरला असून, चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी पहाटे मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून ३८.४२ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकल्प अभियंता देशमुख यांनी सांगितले. प्रकल्प ९७ टक्के भरला असून, कुठल्याही क्षणी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाखालील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चार गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने हे पाणी चक्क शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरत असल्याने पीक क्षेत्राचे कायम नुकसान होत आहे. यासंदर्भात हे क्षेत्र कायमस्वरूपी बाधित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करा...अनेक वर्षांपासून सलगा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पातील पाणी सोडल्यास पिकांची आशा सोडून द्यावी लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी गुरुनाथ जाधव, तुळशीदास साळुंखे, अभिनंदन जाधव, बलभीम जाधव, पंडित जाधव, प्रकाश ओम, निवृत्ती पाटील, प्रकाश जाधव, सतीश जाधव, बळीराम पाटील, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पवार, गोविंद पाटील, हरी साळुंखे, पांडुरंग साळुंखे यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती