शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

By संदीप शिंदे | Updated: September 5, 2022 17:08 IST

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे

निलंगा (जि. लातूर): तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मसलगा प्रकल्प ९७ टक्के भरला असून, चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी पहाटे मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून ३८.४२ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकल्प अभियंता देशमुख यांनी सांगितले. प्रकल्प ९७ टक्के भरला असून, कुठल्याही क्षणी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाखालील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चार गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने हे पाणी चक्क शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरत असल्याने पीक क्षेत्राचे कायम नुकसान होत आहे. यासंदर्भात हे क्षेत्र कायमस्वरूपी बाधित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करा...अनेक वर्षांपासून सलगा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पातील पाणी सोडल्यास पिकांची आशा सोडून द्यावी लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी गुरुनाथ जाधव, तुळशीदास साळुंखे, अभिनंदन जाधव, बलभीम जाधव, पंडित जाधव, प्रकाश ओम, निवृत्ती पाटील, प्रकाश जाधव, सतीश जाधव, बळीराम पाटील, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पवार, गोविंद पाटील, हरी साळुंखे, पांडुरंग साळुंखे यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती