शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

मार्केट यार्ड सोयाबीनचा दर स्थिर; आवक घटलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला असून मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शिवारातील पीक वाया गेले आहे. ...

जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला असून मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शिवारातील पीक वाया गेले आहे. अतिपावसामुळे बुरशी आणि हळद्या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर पडला आहे. त्यामुळे काढणीला वेळ लागणार आहे. सध्या मिळत असलेला भाव राहतो की डाग असल्याचे कारण सांगून दर कमी केले जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या तरी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनलाही चांगले दर मिळतील अशी अपेक्षा आहे.

सध्या बाजारात सोयाबीनला कमाल दर ९ हजार १०० रुपये तर किमान दर ६ हजार ७०० रुपये असून सर्वसाधारण दर ८ हजार ९१० रुपये आहे. हाच दर स्थिर राहिला तर शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल असे बोलले जात आहे. सध्या बाजारात साळ, गहू, ज्वारी, हरभरा,ज्वारी रब्बी, मका, हरभरा,तूर, मूग, उडीद आदी पिकांची आवक असून हरभऱ्याला कमाल दर ६ हजार ६४७ रुपये तर किमान दर ४ हजार ४०० आणि सर्वसाधारण ५ हजार रुपये आहे. मूग, उडीदाची आवकही कमीच आहे. मुगाची आवक ९७५ असून उडीदाची आवक २०६५ क्विंटल आहे. मुगाला सहा हजार रुपये तर उडीद आला सात हजार रुपयाचा दर सध्या बाजारात मिळत आहे.

सोया पेंड आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना नुकसान कारक...

केंद्र शासनाने सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन परदेशातून येण्याची वेळ आणि नवे सोयाबीन बाजारात येण्याची वेळ एकच असल्याने सोयाबीनचे भाव पडतील असे शेतकरी संघटनेसह शेतीशी निगडित असलेल्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोयाबीन आयातीला विरोध दर्शविला आहे. सोयापेंड आयात झाली तरी नव्या सोयाबीनचे दर सध्या सारखेच राहावेत अथवा ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.