शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून सात वर्षात १२० गाड्या तयार हाेणार, लातुरात फॅक्टरीची पाहणी

By राजकुमार जोंधळे | Updated: April 23, 2023 19:14 IST

येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे.

लातूर : येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे. दाेन कंपन्यांना याचे काम देण्यात आले असून, सात वर्षात एकूण १२० रेल्वेगाड्या तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे दिली.

लातुरातील मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीची रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प २०१८ मध्ये लातूरमध्ये सुरू करण्यात आला. याठिकाणी सुरुवातीला रेल्वेचे नवीन डबे बनविण्यात येणार हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी १५ ऑगस्ट राेजी भाषणात सांगितले, आम्ही यावर्षी देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करू... त्यानंतर रेल्वे विभागाच्या आयसीएफ चेन्नईला वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्यात येत आहेत.

लातूरची काेच फॅक्टरी तयार झाल्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे डबे बनविण्यात आले नाहीत. आता या ठिकाणी नवीन निविदा काढण्यात आली. रेल्वेची कंपनी आरव्हीएनएल आणि रशियन कंपनीमध्ये करार झाला. त्यांना १२० वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांनी अनामत रक्कम भरत्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये या फॅक्टरीचा ताबा या कंपन्या घेतील आणि प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या निर्मितीचे काम सुरू हाेईल. यातून लातुरात माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

रेल्वे विभागाने केली ६०० काेटींची गुंतवणूक...

लातुरातील विस्तारीत एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने आतापर्यंत जवळपास ६०० काेटींची गुंतवणूक केली आहे. भविष्यात लागेल तसा निधी देता येणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

टप्प्या-टप्प्याने १२० रेल्वेगाड्यांची बांधणी...

दाेन कंपन्यांच्या संयुक्त करारातून येत्या सात वर्षात एकूण १२० वंदे भारत रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाणार आहे. पहिल्या वर्षात १२, दुसऱ्या वर्षात १८, तिसऱ्या वर्षात २५ रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाईल. सात वर्षात टप्प्या-टप्प्याने हा आकडा वाढविण्यात येणार आहे.