शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून सात वर्षात १२० गाड्या तयार हाेणार, लातुरात फॅक्टरीची पाहणी

By राजकुमार जोंधळे | Updated: April 23, 2023 19:14 IST

येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे.

लातूर : येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे. दाेन कंपन्यांना याचे काम देण्यात आले असून, सात वर्षात एकूण १२० रेल्वेगाड्या तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे दिली.

लातुरातील मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीची रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प २०१८ मध्ये लातूरमध्ये सुरू करण्यात आला. याठिकाणी सुरुवातीला रेल्वेचे नवीन डबे बनविण्यात येणार हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी १५ ऑगस्ट राेजी भाषणात सांगितले, आम्ही यावर्षी देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करू... त्यानंतर रेल्वे विभागाच्या आयसीएफ चेन्नईला वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्यात येत आहेत.

लातूरची काेच फॅक्टरी तयार झाल्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे डबे बनविण्यात आले नाहीत. आता या ठिकाणी नवीन निविदा काढण्यात आली. रेल्वेची कंपनी आरव्हीएनएल आणि रशियन कंपनीमध्ये करार झाला. त्यांना १२० वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांनी अनामत रक्कम भरत्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये या फॅक्टरीचा ताबा या कंपन्या घेतील आणि प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या निर्मितीचे काम सुरू हाेईल. यातून लातुरात माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

रेल्वे विभागाने केली ६०० काेटींची गुंतवणूक...

लातुरातील विस्तारीत एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने आतापर्यंत जवळपास ६०० काेटींची गुंतवणूक केली आहे. भविष्यात लागेल तसा निधी देता येणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

टप्प्या-टप्प्याने १२० रेल्वेगाड्यांची बांधणी...

दाेन कंपन्यांच्या संयुक्त करारातून येत्या सात वर्षात एकूण १२० वंदे भारत रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाणार आहे. पहिल्या वर्षात १२, दुसऱ्या वर्षात १८, तिसऱ्या वर्षात २५ रेल्वेगाड्यांची बांधणी केली जाईल. सात वर्षात टप्प्या-टप्प्याने हा आकडा वाढविण्यात येणार आहे.