शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 11:38 IST

लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली.

लातूर : मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८५ लाखांवर आहे. त्याआधारे आपल्या भागात आणखी ६५० बँका स्थापित केल्या जाऊ शकतात. जनतेला अधिकाधिक बँकिंग सेवेचा लाभ मिळावा, शासकीय योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी बँकांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी येथे केले.

लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली. यावेळी डॉ. कराड बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. मुद्रा योजनेतून १० लाखांपर्यंत कर्ज देता येईल. मागास प्रवर्गातील उमेदवारांना इंडिया स्टार्टअप् योजनेतून वित्त पुरवठा करण्यात येत आहे. त्याचाही लाभ बँकांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जनधन व मुद्रा योजनेची व्याप्ती करण्यात येत आहे.

बैठकीस मराठवाड्यातील बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच उस्मानाबादचे खा. ओम राजेनिंबाळकर, नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आयोजित मराठवाडा आर्थिक मंथन कार्यक्रमाद्वारे मराठवाड्यातील बँकांचे जाळे मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. याशिवाय, एटीएमची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांना बँकेचे कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी, बँका उघडताना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतbankबँकMarathwadaमराठवाडाlaturलातूरAurangabadऔरंगाबाद