शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 11:38 IST

लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली.

लातूर : मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८५ लाखांवर आहे. त्याआधारे आपल्या भागात आणखी ६५० बँका स्थापित केल्या जाऊ शकतात. जनतेला अधिकाधिक बँकिंग सेवेचा लाभ मिळावा, शासकीय योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी बँकांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी येथे केले.

लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली. यावेळी डॉ. कराड बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. मुद्रा योजनेतून १० लाखांपर्यंत कर्ज देता येईल. मागास प्रवर्गातील उमेदवारांना इंडिया स्टार्टअप् योजनेतून वित्त पुरवठा करण्यात येत आहे. त्याचाही लाभ बँकांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जनधन व मुद्रा योजनेची व्याप्ती करण्यात येत आहे.

बैठकीस मराठवाड्यातील बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच उस्मानाबादचे खा. ओम राजेनिंबाळकर, नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आयोजित मराठवाडा आर्थिक मंथन कार्यक्रमाद्वारे मराठवाड्यातील बँकांचे जाळे मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. याशिवाय, एटीएमची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांना बँकेचे कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी, बँका उघडताना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतbankबँकMarathwadaमराठवाडाlaturलातूरAurangabadऔरंगाबाद