शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस ...

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,जिल्ह्यात सामाजिक,आर्थिक,औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची ऊर्जा लाभली आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ संस्थानातील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. त्यावेळी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग होता. त्यात लातूर जिल्ह्याचे योगदानही मोठे होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम सतत १३ महिने सुरू होता. या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता, त्यावेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरू केली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. या लढ्यानंतर लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

जिल्ह्यात १६ सर्कलमध्ये ६५ टक्के पर्जन्यमान झाले असून यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाईन, ऑफलाईन, पद्धतीने अर्ज करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार आहे. सध्या कोविडची दुसरी लाट ओसरत असून संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेचा समाना करण्यासाठी सर्वांनी सर्तक राहावे, असे अवाहवन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सैनिकांचा गौरव...

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.