शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

By हणमंत गायकवाड | Updated: October 2, 2023 11:54 IST

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या एकूण २२ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी सिंचनासाठी धरण भरणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५०.५९४ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. म्हणजे २९ टक्के पाणी प्रकल्पात संकलित झाले आहे. मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत जवळपास ३३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी घ्यायचे झाले तर मोठा पाऊस होणे गरजेचे आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५६० मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर यंदा वीस ते पंचवीस दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. मांजराच्या वर असलेले दोन छोटे प्रकल्प अद्याप भरले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांच्या वर पाऊस होणे गरजेचे आहे. तरच मांजरा प्रकल्पात पाणी येते. गेल्या ४३ वर्षांमध्ये मांजरा प्रकल्पात १६ वेळा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश वेळा मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात भरलेला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. यंदाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

४३ वर्षांत १२ पावसाळ्यांत धरण कोरडेमांजरा प्रकल्पाचे लोकार्पण १९८० मध्ये झाले. १९८० पासून धरण सोळा वेळा १००% भरलेले आहेः त्यानंतर १२ पावसाळ्यांत धरण कोरडेच राहिलेले आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणाची ही स्थिती होती. सात वेळा धरण ५० टक्क्यांच्या पुढे भरले तर आठ वेळा ५०% च्या आत धरणात पाणीसाठा झाला होता. गत सोळा वेळा भरलेले धरण बहुतांश ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरले आहे.

मांजरा प्रकल्पामुळे १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे . त्यातून १०,५५९हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, त्यासाठी धरण १००% भरणे आवश्यक आहे. तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

लातूर शहराला दररोज लागते ५५ एमएलडी पाणीलातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापूर्वी आठ दिवसांआड करण्यात येत होता. पण, गतवर्ती धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पाच दिवसांआड करण्यात येत आहे. पण, धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगपालिका घेणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी