शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

By हणमंत गायकवाड | Updated: October 2, 2023 11:54 IST

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या एकूण २२ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी सिंचनासाठी धरण भरणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५०.५९४ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. म्हणजे २९ टक्के पाणी प्रकल्पात संकलित झाले आहे. मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत जवळपास ३३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी घ्यायचे झाले तर मोठा पाऊस होणे गरजेचे आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५६० मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर यंदा वीस ते पंचवीस दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. मांजराच्या वर असलेले दोन छोटे प्रकल्प अद्याप भरले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांच्या वर पाऊस होणे गरजेचे आहे. तरच मांजरा प्रकल्पात पाणी येते. गेल्या ४३ वर्षांमध्ये मांजरा प्रकल्पात १६ वेळा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश वेळा मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात भरलेला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. यंदाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

४३ वर्षांत १२ पावसाळ्यांत धरण कोरडेमांजरा प्रकल्पाचे लोकार्पण १९८० मध्ये झाले. १९८० पासून धरण सोळा वेळा १००% भरलेले आहेः त्यानंतर १२ पावसाळ्यांत धरण कोरडेच राहिलेले आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणाची ही स्थिती होती. सात वेळा धरण ५० टक्क्यांच्या पुढे भरले तर आठ वेळा ५०% च्या आत धरणात पाणीसाठा झाला होता. गत सोळा वेळा भरलेले धरण बहुतांश ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरले आहे.

मांजरा प्रकल्पामुळे १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे . त्यातून १०,५५९हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, त्यासाठी धरण १००% भरणे आवश्यक आहे. तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

लातूर शहराला दररोज लागते ५५ एमएलडी पाणीलातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापूर्वी आठ दिवसांआड करण्यात येत होता. पण, गतवर्ती धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पाच दिवसांआड करण्यात येत आहे. पण, धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगपालिका घेणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी