शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

By हणमंत गायकवाड | Updated: October 2, 2023 11:54 IST

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या एकूण २२ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी सिंचनासाठी धरण भरणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५०.५९४ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. म्हणजे २९ टक्के पाणी प्रकल्पात संकलित झाले आहे. मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत जवळपास ३३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी घ्यायचे झाले तर मोठा पाऊस होणे गरजेचे आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५६० मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर यंदा वीस ते पंचवीस दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. मांजराच्या वर असलेले दोन छोटे प्रकल्प अद्याप भरले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांच्या वर पाऊस होणे गरजेचे आहे. तरच मांजरा प्रकल्पात पाणी येते. गेल्या ४३ वर्षांमध्ये मांजरा प्रकल्पात १६ वेळा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश वेळा मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात भरलेला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. यंदाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

४३ वर्षांत १२ पावसाळ्यांत धरण कोरडेमांजरा प्रकल्पाचे लोकार्पण १९८० मध्ये झाले. १९८० पासून धरण सोळा वेळा १००% भरलेले आहेः त्यानंतर १२ पावसाळ्यांत धरण कोरडेच राहिलेले आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणाची ही स्थिती होती. सात वेळा धरण ५० टक्क्यांच्या पुढे भरले तर आठ वेळा ५०% च्या आत धरणात पाणीसाठा झाला होता. गत सोळा वेळा भरलेले धरण बहुतांश ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरले आहे.

मांजरा प्रकल्पामुळे १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे . त्यातून १०,५५९हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, त्यासाठी धरण १००% भरणे आवश्यक आहे. तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

लातूर शहराला दररोज लागते ५५ एमएलडी पाणीलातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापूर्वी आठ दिवसांआड करण्यात येत होता. पण, गतवर्ती धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पाच दिवसांआड करण्यात येत आहे. पण, धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगपालिका घेणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी