शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरणावरील पंपिंग सबस्टेशनमध्ये बिघाड; लातूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. गतवर्षीही धरण ८० टक्क्यांच्या पुढे भरले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणी आहे आणि होते. सध्याही धरण ८८ टक्क्यांच्या पुढे भरले आहे. त्यामुळे शहराला पाण्याची टंचाई नाही. परंतु, मनपाच्या तांत्रिक अडचणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मांजरा धरणावरील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करत असतानाच फायबर सिटी आणि सिटी फायबर बस्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्ती झालेली नव्हती. परिणामी, सोमवारी शहरात पाणीपुरवठा होईल की नाही याची खात्री नाही. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार आहेत. एकदा महापालिकेकडे महावितरणचे वीज बिल थकल्यामुळे मागे एकदा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद होता. शिवाय, गेल्या दोन महिन्यांपूर्वी असाच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा पाच-सहा दिवस बंद होता. या ना त्या कारणाने लातूर शहरवासीयांना गेल्या वर्षभरात तीन वेळा पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.

मांजरा धरणावर कधी पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, तर कधी इलेक्ट्रिकल बिघाड होतोय. गेल्या वर्षभरात दोन वेळा असे बिघाड झाले आहेत. कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे लातूरकरांची गैरसोय होत आहे. शनिवारी फायबर सीटची दुरुस्ती केल्यानंतर सिटी फायबर जळाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. फायबर सीट आणि सिटी फायबर वारंवार जळत असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागत आहे, असे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले.

आजपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल...

रविवारी दुरुस्ती झाली तर पंपिंग करून पाण्याची उचल केली जाणार आहे. आर्वी तसेच हरंगुळ येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाण्याचे शुद्धिकरण करून शहरातल्या जलकुंभामध्ये पाणी घेऊन आज, सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता कलवले यांनी सांगितले.