शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

मांजरा धरणावरील पंपिंग सबस्टेशनमध्ये बिघाड; लातूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. गतवर्षीही धरण ८० टक्क्यांच्या पुढे भरले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणी आहे आणि होते. सध्याही धरण ८८ टक्क्यांच्या पुढे भरले आहे. त्यामुळे शहराला पाण्याची टंचाई नाही. परंतु, मनपाच्या तांत्रिक अडचणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मांजरा धरणावरील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करत असतानाच फायबर सिटी आणि सिटी फायबर बस्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्ती झालेली नव्हती. परिणामी, सोमवारी शहरात पाणीपुरवठा होईल की नाही याची खात्री नाही. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार आहेत. एकदा महापालिकेकडे महावितरणचे वीज बिल थकल्यामुळे मागे एकदा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद होता. शिवाय, गेल्या दोन महिन्यांपूर्वी असाच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा पाच-सहा दिवस बंद होता. या ना त्या कारणाने लातूर शहरवासीयांना गेल्या वर्षभरात तीन वेळा पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.

मांजरा धरणावर कधी पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, तर कधी इलेक्ट्रिकल बिघाड होतोय. गेल्या वर्षभरात दोन वेळा असे बिघाड झाले आहेत. कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे लातूरकरांची गैरसोय होत आहे. शनिवारी फायबर सीटची दुरुस्ती केल्यानंतर सिटी फायबर जळाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. फायबर सीट आणि सिटी फायबर वारंवार जळत असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागत आहे, असे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले.

आजपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल...

रविवारी दुरुस्ती झाली तर पंपिंग करून पाण्याची उचल केली जाणार आहे. आर्वी तसेच हरंगुळ येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाण्याचे शुद्धिकरण करून शहरातल्या जलकुंभामध्ये पाणी घेऊन आज, सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता कलवले यांनी सांगितले.