शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

मांजरा धरणावरील पंपिंग सबस्टेशनमध्ये बिघाड; लातूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. गतवर्षीही धरण ८० टक्क्यांच्या पुढे भरले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणी आहे आणि होते. सध्याही धरण ८८ टक्क्यांच्या पुढे भरले आहे. त्यामुळे शहराला पाण्याची टंचाई नाही. परंतु, मनपाच्या तांत्रिक अडचणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मांजरा धरणावरील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करत असतानाच फायबर सिटी आणि सिटी फायबर बस्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्ती झालेली नव्हती. परिणामी, सोमवारी शहरात पाणीपुरवठा होईल की नाही याची खात्री नाही. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार आहेत. एकदा महापालिकेकडे महावितरणचे वीज बिल थकल्यामुळे मागे एकदा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद होता. शिवाय, गेल्या दोन महिन्यांपूर्वी असाच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा पाच-सहा दिवस बंद होता. या ना त्या कारणाने लातूर शहरवासीयांना गेल्या वर्षभरात तीन वेळा पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.

मांजरा धरणावर कधी पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, तर कधी इलेक्ट्रिकल बिघाड होतोय. गेल्या वर्षभरात दोन वेळा असे बिघाड झाले आहेत. कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे लातूरकरांची गैरसोय होत आहे. शनिवारी फायबर सीटची दुरुस्ती केल्यानंतर सिटी फायबर जळाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. फायबर सीट आणि सिटी फायबर वारंवार जळत असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागत आहे, असे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले.

आजपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल...

रविवारी दुरुस्ती झाली तर पंपिंग करून पाण्याची उचल केली जाणार आहे. आर्वी तसेच हरंगुळ येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाण्याचे शुद्धिकरण करून शहरातल्या जलकुंभामध्ये पाणी घेऊन आज, सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता कलवले यांनी सांगितले.