शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 21:04 IST

आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.

लातूर : प्रत्येक मूल शाळेत यावे, शिकावे या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'शिक्षणाच्या वारीचे ' हे तिसरे वर्ष असून या आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणाच्या वारीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लातूर शहरातील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स या ठिकाणी १७ ते १९ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत शिक्षणाची वारी संपन्न होत आहे. लातूर या वारीचे उद्घाटन शिक्षण आयुक्त डॉ. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, विद्या प्राधिकरण, पुणेचे संचालक डॉ. सुनील मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून रंगविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम स्थानांवर नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षक प्रगत झाला तरच शाळा प्रगत होऊ शकते व हे दोन्ही प्रगत झाले तरच विद्यार्थी प्रगत होऊ शकतात. विद्यार्थी प्रगत झाल्यास आदर्श नागरिक घडवणे सुलभ होऊ शकते. यावेळी आ. विक्रम काळे, खा. डॉ. सुनील गायकवाड इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली.विनोद तावडेंनी केले भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना मार्गदर्शनशिक्षणाच्या वारीचे संकल्पक, शालेय व उच्च-तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे मुंबईत अचानक महत्वाची बैठक लागल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. एक शिक्षणप्रेमी व वाचकप्रेमी नेतृत्व अशी ओळख निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरलेल्या विनोद तावडे यांनी लातूरमध्ये संपन्न होत असलेल्या या शिक्षणाच्या वारीला थेट भ्रमणध्वनीवरून संबोधित केले.ते म्हणाले की, लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या लातुरात पहिल्यांदाच ही वारी संपन्न होत आहे. आपल्या सरकारच्या या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. हे यश अर्थातच या वारीच्या माध्यमातून शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे आहे. या वारीच्या माध्यमातून ज्या - ज्या शिक्षकांनी चांगली संकल्पना, प्रयोग केला आहे, त्याचा मोबाईल ॲप तयार केला जावा. राज्याच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा उपयोग अवघ्या देशाला व्हावा, यासाठीही आपण प्रयत्न करू. शिक्षकांना ऑनलाइनच्या कामातून आठ दिवसांत कमी करू, असे तावडे यांनी सांगितले. शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून राज्य लवकरच शिक्षणाच्या क्षेत्रात प्रथम स्थानावर पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त व्यक्त केला

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे