शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे ...

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे पाणी अजूनही अहमदपूरकरांना मृगजळ ठरत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.

लिंबोटी प्रकल्पावरून अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे विद्युत पंप ५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले होते. हे पाणी येण्यासाठी १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले होते. शहरातील फिल्टर प्लान्टमध्ये जेव्हा पाणी येईल, तेव्हापासून शहराच्या प्रत्येक भागात दहा दिवसाला पाणी येणार, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र शहरात अजूनही पाणीच आले नसल्यामुळे लिंबोटीचे पाणी शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे.

लिंबोटीच्या जलवाहिनीच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गळती होत आहे. त्यातील सर्वात मोठी गळती वरवटी व सिंदगी या गावादरम्यान असून, त्याठिकाणी गळती थांबविण्याचे काम करण्यात येत आहे, तसेच बसविण्यात आलेल्या एअर वॉलसुद्धा तांत्रिकदृष्ट्या निकामी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिक दाबाने पाणी फिल्टर प्लाॅन्टकडे येत नाही. सदर पाणी गुगदळ एमआयडीसीजवळ आले असून, त्यापुढे चढ भाग असल्यामुळे पाणी वर चढत नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्व गळती थांबविल्याशिवाय पाणी पुढे चालणार नसल्याचे सांगितले, तसेच चालू असलेला एक पंप ३०० एचपीचा असून, १६८ मीटर उंचीपर्यंत पाणी बाहेर टाकण्याची क्षमता आहे. हा पंप पूर्णपणे कार्यान्वित केल्यानंतर पाणी पुढे येणार असून, तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मध्येच जलवाहिनी फुटू शकते. सध्या कमी दाबाने मोटार चालविली जात आहे. त्यामुळे पाणी वर चढत नाही. शहरात अजून पाणी आले नाही. सदर कामात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक दोष असून ते काढण्यासाठी तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते काम करीत आहेत. परिणामी, अहमदपूरकरांना लवकरात लवकर पाणी मिळण्याच्या आशेवरही पाणी फिरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब...

१९ किमीच्या पाणी पुरवठा जलवाहिनीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती असून, अनेक एअरवॉल सध्या काम करीत नाहीत. त्रुटी काढल्यानंतर आणखीन चार दिवसांनी पूर्ण दाबाने शहरात पाणी येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.

याबाबत तांत्रिक मार्गदर्शक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच नगर परिषदेचे अभियंते हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने पंप चालू होऊन शहरात पाणी येईल, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.