शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे ...

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे पाणी अजूनही अहमदपूरकरांना मृगजळ ठरत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.

लिंबोटी प्रकल्पावरून अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे विद्युत पंप ५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले होते. हे पाणी येण्यासाठी १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले होते. शहरातील फिल्टर प्लान्टमध्ये जेव्हा पाणी येईल, तेव्हापासून शहराच्या प्रत्येक भागात दहा दिवसाला पाणी येणार, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र शहरात अजूनही पाणीच आले नसल्यामुळे लिंबोटीचे पाणी शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे.

लिंबोटीच्या जलवाहिनीच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गळती होत आहे. त्यातील सर्वात मोठी गळती वरवटी व सिंदगी या गावादरम्यान असून, त्याठिकाणी गळती थांबविण्याचे काम करण्यात येत आहे, तसेच बसविण्यात आलेल्या एअर वॉलसुद्धा तांत्रिकदृष्ट्या निकामी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिक दाबाने पाणी फिल्टर प्लाॅन्टकडे येत नाही. सदर पाणी गुगदळ एमआयडीसीजवळ आले असून, त्यापुढे चढ भाग असल्यामुळे पाणी वर चढत नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्व गळती थांबविल्याशिवाय पाणी पुढे चालणार नसल्याचे सांगितले, तसेच चालू असलेला एक पंप ३०० एचपीचा असून, १६८ मीटर उंचीपर्यंत पाणी बाहेर टाकण्याची क्षमता आहे. हा पंप पूर्णपणे कार्यान्वित केल्यानंतर पाणी पुढे येणार असून, तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मध्येच जलवाहिनी फुटू शकते. सध्या कमी दाबाने मोटार चालविली जात आहे. त्यामुळे पाणी वर चढत नाही. शहरात अजून पाणी आले नाही. सदर कामात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक दोष असून ते काढण्यासाठी तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते काम करीत आहेत. परिणामी, अहमदपूरकरांना लवकरात लवकर पाणी मिळण्याच्या आशेवरही पाणी फिरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब...

१९ किमीच्या पाणी पुरवठा जलवाहिनीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती असून, अनेक एअरवॉल सध्या काम करीत नाहीत. त्रुटी काढल्यानंतर आणखीन चार दिवसांनी पूर्ण दाबाने शहरात पाणी येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.

याबाबत तांत्रिक मार्गदर्शक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच नगर परिषदेचे अभियंते हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने पंप चालू होऊन शहरात पाणी येईल, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.