शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

लिंबाळवाडीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने ...

चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गाव आठ दिवसांसाठी बंद केले होते. परिणामी, संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. सध्या केवळ १४ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ते उपचार घेत आहेत.

चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात धार्मिक कार्यक्रम झाला. त्यास गावातील अबालवृद्ध हजर होते. तेथून गावात कोरोनाचा शिरकाव झाला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. दिवसेंदिवस संसर्ग वाढू लागला. त्यामुळे प्रशासनही हादरले. गावात कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा १८८ बाधित आढळले. त्यामुळे प्रशासनाने गावबंद केले.

गावातच राहून काहीजण उपचारानंतर बरे झाले. काहींना चाकूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याच कालावधीत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आज गाव या संकटातून सावरले आहे. आता गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण कडक निर्बंध पाळत आहेत.

गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह...

गावात कोरोनाचा संसर्ग होईल, असे वाटत नव्हते. सुरुवातीस एकजण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संसर्ग सुरु झाला आणि गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह आढळत होता. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलली. सर्व गावकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावकरी आज एकदिलाने या संकटातून बाहेर आले आहेत, असे लिंबाळावाडीचे सरपंच शरण बिराजदार यांनी सांगितले.

मास्कशिवाय कोणीही घराबाहेर येत नाही...

कोरोनाच्या संसर्गानंतर गावात शांतता आहे. अबालवृध्द मास्कशिवाय घराबाहेर पडत नाहीत. गावातील कोणीही कोणाच्याही घरी जात नाहीत. गावातील धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. मला काही त्रास झाला नाही. मात्र, दाेन नाती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्याही आता ठणठणीत झाल्या आहेत, असे गावातील सगुणाबाई बिराजदार यांनी सांगितले.

नियमांचे काटेकोरपणे पालन...

आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कोरोनामुळे गावातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आता गावातील प्रत्येकजण नियमांचे पालन करीत आहे. सर्वजण फिजिकल डिस्टन्स ठेवून एकमेकांशी बोलतात. गावातही जागृती होण्यासाठी गावाला बरेच मूल्य द्यावे लागले आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लिंबाळवाडीतील घटनेला जबाबदार कोण, हे प्रशासनाने अद्याप निश्चित केले नाही.