शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

लोकशाहीच्या मजबुतीसाठी चला मतदान करूया; जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:48 IST

 लातूर लोकसभेसाठी ७५ टक्क्यांचे उद्दिष्ट

ठळक मुद्देसैनिकांसाठी विशेष सुविधा... 

- आशपाक पठाण

लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून जनाजगृती करण्यात येत आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, यावर्षी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासन मतदारसंघात जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देणार आहेत. पोस्टर्स, पॉम्प्लेटच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करीत आहोत. होळीच्या निमित्ताने व्हीडिओ क्लीप तयार केली असून, ती समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे. अंध, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक (ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही) अशा नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने वाहनांची सोय केली आहे. आमचा निवडणूक रथ गावा-गावात, प्रभागातील बूथवर मतदानासाठी अशा मतदारांना पोहोचविण्याचे काम करणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय कार्यालये व गावस्तरावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व विशद केले जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात २८ मार्चपासून प्रचार व प्रसार करण्याचे काम वाढविले जाणार आहे. 

पालकांना विद्यार्थ्यांचे पत्र... मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शहरातील विशेष म्हणजे उच्चभ्रू शाळेत ईव्हीएम मशीनचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाईल. शिवाय, सदरील विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी आवाहन करणारे संकल्प पत्र लिहितील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. 

सैनिकांसाठी विशेष सुविधा... लातूर लोकसभा मतदारसंघात नोकरीच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार मतदार बाहेरगावी आहेत. यात विशेष म्हणजे सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविल्या जातील. संबंधित व्यक्ती मतदान करून त्या मतपत्रिका पोस्टाद्वारे परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवतील. यासाठी साडेचार हजार जणांना मतपत्रिका पाठविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlaturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरVotingमतदान