शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लोकशाहीच्या मजबुतीसाठी चला मतदान करूया; जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:48 IST

 लातूर लोकसभेसाठी ७५ टक्क्यांचे उद्दिष्ट

ठळक मुद्देसैनिकांसाठी विशेष सुविधा... 

- आशपाक पठाण

लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून जनाजगृती करण्यात येत आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, यावर्षी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासन मतदारसंघात जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देणार आहेत. पोस्टर्स, पॉम्प्लेटच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करीत आहोत. होळीच्या निमित्ताने व्हीडिओ क्लीप तयार केली असून, ती समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे. अंध, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक (ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही) अशा नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने वाहनांची सोय केली आहे. आमचा निवडणूक रथ गावा-गावात, प्रभागातील बूथवर मतदानासाठी अशा मतदारांना पोहोचविण्याचे काम करणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय कार्यालये व गावस्तरावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व विशद केले जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात २८ मार्चपासून प्रचार व प्रसार करण्याचे काम वाढविले जाणार आहे. 

पालकांना विद्यार्थ्यांचे पत्र... मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शहरातील विशेष म्हणजे उच्चभ्रू शाळेत ईव्हीएम मशीनचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाईल. शिवाय, सदरील विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी आवाहन करणारे संकल्प पत्र लिहितील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. 

सैनिकांसाठी विशेष सुविधा... लातूर लोकसभा मतदारसंघात नोकरीच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार मतदार बाहेरगावी आहेत. यात विशेष म्हणजे सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविल्या जातील. संबंधित व्यक्ती मतदान करून त्या मतपत्रिका पोस्टाद्वारे परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवतील. यासाठी साडेचार हजार जणांना मतपत्रिका पाठविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlaturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरVotingमतदान