शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'आम्हाला शिकू द्या, लवकर शिक्षकांची नियुक्ती करा'; विद्यार्थ्यांचा लातूर जिल्हा परिषदेत ठिय्या

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2023 16:25 IST

शैक्षणिक नुकसान होत असल्याने अंधोरीतील मुले आक्रमक

लातूर : अंधोरी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी, आम्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी बुधवारी थेट जिल्हा परिषद गाठली अन् दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, सीईओंकडे धाव घेऊन आपल्या अडचणी मांडल्या.

अहमदपूर तालुक्यातील अंधाेरी येथे जिल्हा परिषद प्रशाला आहे. प्रशालेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रशालेची पटसंख्या जवळपास २३० आहे. प्रशालेसाठी एकूण १० शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. प्रशालेतील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामाजिकशास्त्र तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्र विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही. तसेच प्राथमिक शिक्षकाचे एक पद रिक्त आहे.

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. परिणामी, शाळेची पटसंख्या घटत आहे. काही पालकांनी आपल्या मुलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन अन्य शाळेत प्रवेश घेतला आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत बुधवारी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सदस्य नमोद कांबळे, गुणवंत बेंबडे, शेषाबाई कावळे, त्रिमुख बने यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

अन् पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखले...जिल्हा परिषदेचे सीईओ अथवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडण्यासाठी अंधोरीच्या प्रशालेतील विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी बुधवारी सकाळी वाहनाने जिल्हा परिषदेत आले. ते मुख्य इमारतीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना तिथेच रोखले. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...दोन वर्षांपासून प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे रिक्त आहेत. ती भरण्यात यावीत म्हणून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहोत. परंतु, अद्यापही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याठी विद्यार्थ्यांसह आम्ही हे आंदोलन केले.- दिनेश सूर्यवंशी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, अंधोरी.

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण