शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लातूरची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अपडेट ! सहा पथकातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण 

By हणमंत गायकवाड | Updated: July 26, 2023 15:33 IST

अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही; तरीपण आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.

लातूर :  गतवर्षी पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदा लातूरची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अपडेट करण्यात आली आहे. बचाव आणि शोध कार्यासाठी एकूण सहा पथके असून, त्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सिंधुदुर्ग येथे यातील किमान दहा जणांना बचाव कार्याचे नव्याने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

औराद शहाजनी, हलगरा या महसूल मंडळांत पाऊस झाला असला तरी गतवर्षीसारखी परिस्थिती नाही. अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही; तरीपण आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. लातूर शहरात तीन आणि जिल्ह्यात तीन, अशी एकूण सहा पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. पोलिस मुख्यालयात एक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन, तसेच उदगीर, अहमदपूर आणि निलंगा तालुक्यासाठी प्रत्येकी एक पथक आहे.

बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री...जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव कार्यासाठी लागणारे सगळे साहित्य तयार केले आहे. बोटी, लाइफ जाकीट, लाइफ रिंग, इमर्जन्सी लाइट, सर्च लाउट, वूड कटर, काँक्रीट कटर, सेफ्ट नेट, अत्यावश्यक शिड्या, रेस्क्यू रोप आदी साहित्य सज्ज ठेवले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात पालिकेची यंत्रणापाऊस झाल्यामुळे नाल्या अडून घरामध्ये पाणी शिरण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तशी परिस्थिती उद्भवली तर त्याला सामोरे जाण्यासाठीही महानगरपालिकेच्या यंत्रणेला सज्ज करण्यात आले आहे. नाल्या तुंबून पाणी अडणार नाही या अनुषंगानेही सकल भागामध्ये दक्षता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय करण्यात आला आहे.

जीर्ण इमारतींबाबत संबंधित मालमत्ताधारकांना सूचनागाव भागामध्ये १५ ते २० जीर्ण इमारती परिसरात वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यांना इमारती पाण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. इमारत कोसळण्याची शक्यता असलेल्या इमारती न पडल्यास महानगरपालिका या अनुषंगाने कारवाई करणार आहे.

यंत्रणा सक्षमप्रत्येक पथकात आठ ते दहा कर्मचारी आहेत. त्यांना बचाव कार्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंत्रणा सक्षम केली आहे. कोणत्याही क्षणी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.- साकेत उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :laturलातूरRainपाऊस