शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

Latur ZP सीईओंची बदली? व्हायरल मेसेजवरून जिल्हा परिषदेत उडाला गोंधळ,'हे' आहे सत्य...

By हरी मोकाशे | Updated: July 8, 2023 19:24 IST

सोशल मीडियावरील संदेश खरा आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते.

लातूर : कानात आणि डोळ्यांत अंतर आहे. त्यामुळे कानांनी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेली अधिक विश्वसनीय असते, असे सर्वजण म्हणतात. मात्र, शुक्रवारी बहुतांश जणांनी डोळ्यांनी पाहिलेल्या सोशल मीडियावरील संदेशावरून एकमेकांशी संवाद साधत ते खरं आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते. तो व्हायरल संदेश होता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचा. अखेर सोशल मीडियावरील तो संदेशच बनावट असल्याचे समजल्यानंतर चर्चेस पूर्णविराम मिळाला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे जुलै २०२० मध्ये येथे रुजू झाले आहेत. ते आपल्या कार्यकाळात चांगले कार्य करत असून, सातत्याने विविध नवनवीन उपक्रमही राबवत आहेत. गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत. दरम्यान, त्यांचा येथे जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काेणाची नियुक्ती होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोस्ट व्हायरल झाली. त्यातील पहिल्या नावात बदल एडिट करत अभिनव गोयल असे करण्यात आले. ही पोस्ट पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांशी संवाद साधत सोशल मीडियावरील तो संदेश खरा आहे का? अशी विचारणा करू लागले. जिल्हा परिषदेतील बहुतांश जणांना या संदेशाची उत्सुकता लागली होती. अखेर जिल्हा परिषदेतील विश्वसनीय अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेतल्यानंतर संदेशच बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डोळ्यांनी पाहिलं तरी ते खरं आहे हे सांगता येत नाही, अशी चर्चा करीत होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाlaturलातूर