शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

Latur ZP सीईओंची बदली? व्हायरल मेसेजवरून जिल्हा परिषदेत उडाला गोंधळ,'हे' आहे सत्य...

By हरी मोकाशे | Updated: July 8, 2023 19:24 IST

सोशल मीडियावरील संदेश खरा आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते.

लातूर : कानात आणि डोळ्यांत अंतर आहे. त्यामुळे कानांनी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेली अधिक विश्वसनीय असते, असे सर्वजण म्हणतात. मात्र, शुक्रवारी बहुतांश जणांनी डोळ्यांनी पाहिलेल्या सोशल मीडियावरील संदेशावरून एकमेकांशी संवाद साधत ते खरं आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते. तो व्हायरल संदेश होता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचा. अखेर सोशल मीडियावरील तो संदेशच बनावट असल्याचे समजल्यानंतर चर्चेस पूर्णविराम मिळाला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे जुलै २०२० मध्ये येथे रुजू झाले आहेत. ते आपल्या कार्यकाळात चांगले कार्य करत असून, सातत्याने विविध नवनवीन उपक्रमही राबवत आहेत. गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत. दरम्यान, त्यांचा येथे जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काेणाची नियुक्ती होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोस्ट व्हायरल झाली. त्यातील पहिल्या नावात बदल एडिट करत अभिनव गोयल असे करण्यात आले. ही पोस्ट पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांशी संवाद साधत सोशल मीडियावरील तो संदेश खरा आहे का? अशी विचारणा करू लागले. जिल्हा परिषदेतील बहुतांश जणांना या संदेशाची उत्सुकता लागली होती. अखेर जिल्हा परिषदेतील विश्वसनीय अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेतल्यानंतर संदेशच बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डोळ्यांनी पाहिलं तरी ते खरं आहे हे सांगता येत नाही, अशी चर्चा करीत होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाlaturलातूर