- राजकुमार जाेंधळे कासार शिरसी (जि. लातूर) - जयंतीच्या वादातून झालेल्या शिक्षकाच्या खून प्रकरणात फरार दाेघा आराेपींच्या मुसक्या हैदराबाद येथून पाेलिस पथकांनी आवळल्या आहेत. ही कारवाई कासार शिरसी ठाण्याच्या पाेलिसांनी केली आहे. आतापर्यंत सर्व ९ आराेपींना अटक करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औंढा (ता. निलंगा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरून वाद झाला हाेता. दरम्यान, २६ एप्रिलरोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीमध्ये बडूर गावचे शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कासार शिरसी पाेलिस ठाण्यात दत्तू मारुती गायकवाड (रा. औंढा), अजय चौंडा, अझर मोहम्मद ,आदित्य मोरे, गजेंद्र सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार शिरसी), संजय गायकवाड राजेंद्र गायकवाड, शहाजी गायकवाड (रा. औंढा) अशा ९ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करत सात आरोपींना अटक केली. मात्र, यातील अझर मोहम्मद आणि गजेंद्र सरवदे हे पाेलिसांना गुंगारा देत फरार हाेते. दरम्यान, ते हैदराबाद येथे दडून बसल्याची माहिती कासार शिरसी पाेलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधार पाेलिस पथक हैदराबाद येथे धडकत दाेघा फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक व्हावी, गुरुलिंग हासुरे यांना न्याय मिळावा म्हणून बडूर येथे गेल्या आठवडाभरापासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिली आहे. गुरुवारी डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही बडूर येथे भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. फरार आराेपींना तातडीने अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली हाेती. दरम्यान, अवघ्या २४ तासात सहायक पाेलिस निरीक्षक प्रविण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, बाळू गायकवाड, श्रीहरी डावरगावे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने दाेघा आराेपींच्या हैदराबाद येथून मुसक्या आवळल्या आहेत.