शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Latur: अक्षरओळख नसलेल्या पालकांचा तांड्यावरील मुलगा झाला पीएसआय

By आशपाक पठाण | Updated: August 3, 2024 18:47 IST

Latur News: आई-वडील दोघेही निरक्षर. कोरडवाहू दोन एकर जमीन. त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द. डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली.

- आशपाक पठाण लातूर - आई-वडील दोघेही निरक्षर. कोरडवाहू दोन एकर जमीन. त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द. डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. त्यात चारवेळा अपयश आल्यावरही जिद्द सोडली नाही. संयम ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्याने पाचव्या प्रयत्नात तांड्यावरचा हा मुलगा ‘पीएसआय’ झाला.

मुखेड तालुक्यातील सावळी तांडा येथील रहिवासी असलेले विठ्ठल वसंतराव राठोड. आई-वडील मजुरी, शेळ्या सांभाळून घरगाडा चालवितात. दोन मुले, एक मुलगी असे कुटंब. मोठा मुलगा विठ्ठल याचे पूर्ण शिक्षण आश्रमशाळेत झाले. उदगीरच्या आश्रमशाळेत अकरावी, बारावी झाल्यावर डी.एड. केले. शिक्षक व्हायचे म्हणून ‘टीईटी’ची तयारी करण्यासाठी ८ वर्षांपूर्वी गावातून लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. मग काय ‘टीईटी’चा नाद सोडला अन् स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात मन रमले. तब्बल तीन वेळा पूर्व परीक्षेत अपयश आले. चौथ्यावेळी मुख्य परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले. तरीही संयम ठेवला. पाचव्यांदा यश आले, निकाल जाहीर होताच मित्रपरिवार अन् ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव सुरू केला. अक्षर ओळख नसलेल्या पालकांच्या कौतुकासाठी ग्रामस्थांची रीघ लागली. मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या हस्ते लातूरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. मित्रांनी पेढे भरविले.

योग्य मार्गदर्शक, संयम, सातत्य महत्त्वाचे...स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना संयम महत्त्वाचा आहे. अपयश आले म्हणून खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले की मन एकाग्र राहते. सतत प्रयत्न करीत राहावेत. मला चारवेळा अपयश आले. वर्ष २०१८ मध्ये गुप्त वार्ता अधिकारी म्हणून निवड झाली; पण उंची मायक्रो २ मध्ये कमी पडल्याने अपयश आले. तरीही खचून न जाता मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवले. डी.एड. असतानाही शिक्षक पदासाठी कुठलीच परीक्षा दिली नाही. जे लक्ष्य ठेवले त्यात यश मिळाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला पीएसआय विठ्ठल राठोड यांनी दिला आहे.

दोन्ही भावंडे झाले अधिकारी...अक्षर ओळख नसलेल्या आई-वडिलांनी दोन्ही मुलांना जिद्दीने शिक्षण दिले. मुलांनीही पालकांच्या कष्टाचे चीज केले. लहान मुलगा भरत राठोड हा दहा महिन्यांपूर्वीच कर सहायक झाला. आता मोठा मुलगा विठ्ठल राठोड हाही साहेब झाला. त्याची आई, पत्नी, बहिणीसह कुटुंबातील सर्वांना खूप आनंद झाल्याचे वडील वसंतराव राठोड यांनी सांगितले. विशेष म्हणजे विठ्ठल यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना एक मुलगीही आहे. पत्नीचे शिक्षण दहावीपर्यंतचे असतानाही पती साहेब व्हावा म्हणून सतत प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले.

टॅग्स :laturलातूरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी