शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

लातूर विभागाचा बारावीचा ८६.०८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:07 IST

निकालात लातूर जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद पिछाडीवर 

ठळक मुद्दे८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

लातूर : बारावीच्या परीक्षेस लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८६़.०८ टक्के लागला असून, परीक्षेला सामोरे गेलेल्या ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २़२३ टक्क्यांनी लातूर विभागाचा निकाल घसरला आहे. दरम्यान मंडळात लातूर जिल्हा अव्वल स्थानी असून नांदेड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून ८६ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पैकी ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९३़०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १० हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. पैकी ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२़०३ टक्के लागला आहे. तर कला शाखेतून ३४ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २६ हजार ८९३ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ७८.४४ टक्के लागला आहे. व्होकेशनलमधून ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३०  उत्तीर्ण झाले असून, या विभागाचा निकाल ७४.६९ टक्के लागला आहे.

लातूर मंडळांतर्गत लातूर जिल्ह्यातून ३४ हजार २४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३१ हजार ७० उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८६़.२० टक्के लागला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६५९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १२ हजार ९५३ उत्तीर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२़.७२ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र