शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

लातूर विभागाचा बारावीचा ८६.०८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:07 IST

निकालात लातूर जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद पिछाडीवर 

ठळक मुद्दे८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

लातूर : बारावीच्या परीक्षेस लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८६़.०८ टक्के लागला असून, परीक्षेला सामोरे गेलेल्या ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २़२३ टक्क्यांनी लातूर विभागाचा निकाल घसरला आहे. दरम्यान मंडळात लातूर जिल्हा अव्वल स्थानी असून नांदेड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून ८६ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पैकी ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९३़०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १० हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. पैकी ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२़०३ टक्के लागला आहे. तर कला शाखेतून ३४ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २६ हजार ८९३ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ७८.४४ टक्के लागला आहे. व्होकेशनलमधून ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३०  उत्तीर्ण झाले असून, या विभागाचा निकाल ७४.६९ टक्के लागला आहे.

लातूर मंडळांतर्गत लातूर जिल्ह्यातून ३४ हजार २४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३१ हजार ७० उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८६़.२० टक्के लागला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६५९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १२ हजार ९५३ उत्तीर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२़.७२ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र