शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

By हरी मोकाशे | Updated: August 19, 2023 17:02 IST

मघामुळे आशा वाढल्या : गतवर्षीच्या तुलनेत २०५ मिमी पावसाची तूट

लातूर : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून खरीप पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२३.९ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत २०५.४ मिमी पावसाची तूट आहे.

जिल्ह्यात यंदा विलंबाने पावसाला सुरुवात झाली. मृग कोरडा गेल्याने खरीप पेरणीस उशीर झाला. जून अखेरीस पासून काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या सुुरू होत्या. वेळेवर पावसाची बरसात न झाल्याने जिल्ह्यात उडीद, मूग आणि तुरीच्या पेऱ्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे आंतर मशागतीची कामे खोळंबली होती. परिणामी, पिकांत तण वाढले होते.

जुलैअखेरपासून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील मशागतीच्या कामांना वेग आला होता. शेतकरी तण नष्ट करण्यासाठी तणनाशकांची फवारणी करीत होते. तद्नंतर जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

सोयाबीन फुलोऱ्याच्या स्थितीत...मध्यंतरी पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन जोमात उगवले. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. सध्या सोयाबीन हे फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनसह अन्य पिकांना पावसाची गरज आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने हलक्या रानावरील पिके दुपार धरू लागली आहेत. दरम्यान, गुरुवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

मध्यम प्रकल्पात २० टक्के जलसाठा...जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात सध्या २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारेच्या १३४ प्रकल्पात २३ टक्के तर २७ बॅरेजेसमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासाठी तसेच पिकांसाठी पावसाची गरज आहे.

सर्वाधिक पाऊस देवणी तालुक्यात...तालुका - आतापर्यंतचा सरासरी पाऊस मिमीमध्येलातूर - ३०५.६औसा - २५१.९अहमदपूर - ३०४.४निलंगा - ३०८.०उदगीर - ४४६.७चाकूर - २७१.२रेणापूर - २५६.५देवणी - ५०१.८शिरुर अनं. - ३५०.९जळकोट - ३७८.७एकूण - ३२३.९

गेल्यावर्षीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणी कमी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून त्यावर विविध गावांच्या जल योजना आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही सातत्याने दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नाही. व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अद्यापही झाला नाही. तावरजा प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्यम प्रकल्पात ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या केवळ २० टक्के आहे.

दोन प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा...प्रकल्प - सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा - गेल्या वर्षीचा पाणीसाठातावरजा - २% - ४१%रेणापूर - २४% - ९८%व्हटी - ०० - ६७%तिरू - ०० - ८१%देवर्जन - ३९% - १००%साकोळ - ५४% - १००%घरणी - २८% - १००%मसलगा - ३०% - ८७%एकूण - २०% - ८३%

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी