शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

By हरी मोकाशे | Updated: August 19, 2023 17:02 IST

मघामुळे आशा वाढल्या : गतवर्षीच्या तुलनेत २०५ मिमी पावसाची तूट

लातूर : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून खरीप पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२३.९ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत २०५.४ मिमी पावसाची तूट आहे.

जिल्ह्यात यंदा विलंबाने पावसाला सुरुवात झाली. मृग कोरडा गेल्याने खरीप पेरणीस उशीर झाला. जून अखेरीस पासून काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या सुुरू होत्या. वेळेवर पावसाची बरसात न झाल्याने जिल्ह्यात उडीद, मूग आणि तुरीच्या पेऱ्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे आंतर मशागतीची कामे खोळंबली होती. परिणामी, पिकांत तण वाढले होते.

जुलैअखेरपासून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील मशागतीच्या कामांना वेग आला होता. शेतकरी तण नष्ट करण्यासाठी तणनाशकांची फवारणी करीत होते. तद्नंतर जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

सोयाबीन फुलोऱ्याच्या स्थितीत...मध्यंतरी पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन जोमात उगवले. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. सध्या सोयाबीन हे फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनसह अन्य पिकांना पावसाची गरज आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने हलक्या रानावरील पिके दुपार धरू लागली आहेत. दरम्यान, गुरुवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

मध्यम प्रकल्पात २० टक्के जलसाठा...जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात सध्या २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारेच्या १३४ प्रकल्पात २३ टक्के तर २७ बॅरेजेसमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासाठी तसेच पिकांसाठी पावसाची गरज आहे.

सर्वाधिक पाऊस देवणी तालुक्यात...तालुका - आतापर्यंतचा सरासरी पाऊस मिमीमध्येलातूर - ३०५.६औसा - २५१.९अहमदपूर - ३०४.४निलंगा - ३०८.०उदगीर - ४४६.७चाकूर - २७१.२रेणापूर - २५६.५देवणी - ५०१.८शिरुर अनं. - ३५०.९जळकोट - ३७८.७एकूण - ३२३.९

गेल्यावर्षीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणी कमी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून त्यावर विविध गावांच्या जल योजना आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही सातत्याने दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नाही. व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अद्यापही झाला नाही. तावरजा प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्यम प्रकल्पात ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या केवळ २० टक्के आहे.

दोन प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा...प्रकल्प - सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा - गेल्या वर्षीचा पाणीसाठातावरजा - २% - ४१%रेणापूर - २४% - ९८%व्हटी - ०० - ६७%तिरू - ०० - ८१%देवर्जन - ३९% - १००%साकोळ - ५४% - १००%घरणी - २८% - १००%मसलगा - ३०% - ८७%एकूण - २०% - ८३%

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी