शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:49 IST

लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

लातूर  - लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.़ शिवाय, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होत आहे़ जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पावर ग्रामीण भागाची मदार आहे़ मात्र या प्रकल्पात केवळ ३़७८ टक्के जलसाठा असल्याने भटकंती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात ५८ टँकरद्वारे ४६ गावे आणि १२ वाडी-तांड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. गत पावसाळ्यात ६४ टक्के पाऊस झाला़ परिणामी, जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली़ साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, मसलगा, व्हटी, तिरू व देवर्जन या मध्यम प्रकल्पांपैकी आजघडीला साकोळ, घरणी आणि मसलगा या तीन मध्यम प्रकल्पांचा अपवाद वगळता पाणीपुरवठा होऊ शकत नाही़ प्रकल्प कोरडेच पडले आहेत़ १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे.त्यामुळे या प्रकल्पांचाही जिल्ह्याला सध्यातरी उपयोग नाही़ शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातही १७़७१९ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ जून अखेरपर्यंत या पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे़ गेल्या १५ दिवसांपासून पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर आणला आहे़पशुधनाच्या चा-याचा प्रश्न जटिलजिल्ह्यात लहान- मोठी ७ लाख ५२ हजार पशुधनाची संख्या आहे़ ५ लाख ७२ हजार २१९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा टंचाई जाणवत आहे़ दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अहिंसा संघाच्या पुढाकाराने चारा छावणी सुरू करण्यात आली असून, त्यात जवळपास एक हजार जनावरे दाखल झाली आहेत़ चारा टंचाईमुळे काही शेतकरी कर्नाटकातून चारा आणत आहेत़345 गावांत टंचाई३४५ गावे आणि ९६ वाडी-तांड्यांना ६०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाकडे ७२ गावे व १७ वाडी-तांड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.५ हजारच मजुरांना कामजिल्ह्यात ५ लाख ८२ हजार नोंदणीकृत मजूर आहेत़ त्यापैकी केवळ पाच हजार मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत़ प्रशासनाकडून मागेल त्याला काम देण्याचा दावा आहे़ मात्र मजुरी कमी असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई