शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:49 IST

लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

लातूर  - लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.़ शिवाय, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होत आहे़ जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पावर ग्रामीण भागाची मदार आहे़ मात्र या प्रकल्पात केवळ ३़७८ टक्के जलसाठा असल्याने भटकंती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात ५८ टँकरद्वारे ४६ गावे आणि १२ वाडी-तांड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. गत पावसाळ्यात ६४ टक्के पाऊस झाला़ परिणामी, जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली़ साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, मसलगा, व्हटी, तिरू व देवर्जन या मध्यम प्रकल्पांपैकी आजघडीला साकोळ, घरणी आणि मसलगा या तीन मध्यम प्रकल्पांचा अपवाद वगळता पाणीपुरवठा होऊ शकत नाही़ प्रकल्प कोरडेच पडले आहेत़ १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे.त्यामुळे या प्रकल्पांचाही जिल्ह्याला सध्यातरी उपयोग नाही़ शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातही १७़७१९ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ जून अखेरपर्यंत या पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे़ गेल्या १५ दिवसांपासून पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर आणला आहे़पशुधनाच्या चा-याचा प्रश्न जटिलजिल्ह्यात लहान- मोठी ७ लाख ५२ हजार पशुधनाची संख्या आहे़ ५ लाख ७२ हजार २१९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा टंचाई जाणवत आहे़ दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अहिंसा संघाच्या पुढाकाराने चारा छावणी सुरू करण्यात आली असून, त्यात जवळपास एक हजार जनावरे दाखल झाली आहेत़ चारा टंचाईमुळे काही शेतकरी कर्नाटकातून चारा आणत आहेत़345 गावांत टंचाई३४५ गावे आणि ९६ वाडी-तांड्यांना ६०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाकडे ७२ गावे व १७ वाडी-तांड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.५ हजारच मजुरांना कामजिल्ह्यात ५ लाख ८२ हजार नोंदणीकृत मजूर आहेत़ त्यापैकी केवळ पाच हजार मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत़ प्रशासनाकडून मागेल त्याला काम देण्याचा दावा आहे़ मात्र मजुरी कमी असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई