शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:49 IST

लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

लातूर  - लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.़ शिवाय, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होत आहे़ जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पावर ग्रामीण भागाची मदार आहे़ मात्र या प्रकल्पात केवळ ३़७८ टक्के जलसाठा असल्याने भटकंती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात ५८ टँकरद्वारे ४६ गावे आणि १२ वाडी-तांड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. गत पावसाळ्यात ६४ टक्के पाऊस झाला़ परिणामी, जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली़ साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, मसलगा, व्हटी, तिरू व देवर्जन या मध्यम प्रकल्पांपैकी आजघडीला साकोळ, घरणी आणि मसलगा या तीन मध्यम प्रकल्पांचा अपवाद वगळता पाणीपुरवठा होऊ शकत नाही़ प्रकल्प कोरडेच पडले आहेत़ १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे.त्यामुळे या प्रकल्पांचाही जिल्ह्याला सध्यातरी उपयोग नाही़ शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातही १७़७१९ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ जून अखेरपर्यंत या पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे़ गेल्या १५ दिवसांपासून पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर आणला आहे़पशुधनाच्या चा-याचा प्रश्न जटिलजिल्ह्यात लहान- मोठी ७ लाख ५२ हजार पशुधनाची संख्या आहे़ ५ लाख ७२ हजार २१९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा टंचाई जाणवत आहे़ दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अहिंसा संघाच्या पुढाकाराने चारा छावणी सुरू करण्यात आली असून, त्यात जवळपास एक हजार जनावरे दाखल झाली आहेत़ चारा टंचाईमुळे काही शेतकरी कर्नाटकातून चारा आणत आहेत़345 गावांत टंचाई३४५ गावे आणि ९६ वाडी-तांड्यांना ६०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाकडे ७२ गावे व १७ वाडी-तांड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.५ हजारच मजुरांना कामजिल्ह्यात ५ लाख ८२ हजार नोंदणीकृत मजूर आहेत़ त्यापैकी केवळ पाच हजार मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत़ प्रशासनाकडून मागेल त्याला काम देण्याचा दावा आहे़ मात्र मजुरी कमी असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई