शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लातूरमध्ये १० रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:35 IST

सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये ९ ते ५८ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण २ हजार ३३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे १ हजार ५७ व्यक्ती होम क्वारंटाईन

लातूर : ठाणे येथील मनपाच्या रुग्णालयातून थेट लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णासह वडवळ नागनाथ येथील अतिगंभीर रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, आता जिल्ह्यात एकूण २३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 

सोमवारी सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये ९ ते ५८ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यातील काही रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. ठाणे येथील म्युनिसिपल कार्पोरेशनच्या रुग्णालयातून १७ मे रोजी लातूरच्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत एक रुग्ण दाखल झाला होता. तसेच मुंबईहून आलेला वडवळ नागनाथ येथील रुग्णही गंभीर होता. या दोन्ही रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने सोमवारी त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, अन्य आठ रुग्णांनाही रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. यापूर्वी १११ रुग्णांना सुटी मिळाली असून, आतापर्यंत १२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात एकूण २ हजार ३३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, त्यात १ हजार ८५७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. १ हजार ५७ व्यक्ती होम क्वारंटाईन असून, १ हजार ४२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सोमवारी लातूरचे १५ आणि उदगीरच्या १३ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले असून, रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त होतील.

टॅग्स :laturलातूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस