शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

गेल्या उन्हाळ्यात पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिलं; तब्बल १० महिन्यांनी आले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:32 IST

गेल्या उन्हाळ्यात गावास पाणी दिले; विहीर अधिग्रहणाचे यंदा पैसे मिळू लागले !

लातूर : भरउन्हात गावकऱ्यांची होणारी पायपीट पाहून बळीराजाने पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिले. त्यामुळे पदरात पडणाऱ्या पिकांचे नुकसान सहन करीत गावची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यांचे अधिग्रहणाच्या पैशाकडे डोळे लागून होते. तब्बल दहा महिन्यांनी ३ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे गतवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवत होत्या. फेब्रुवारीपासून तर टंचाईचे चटके वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची घागरभर पाण्यासाठी एक-दीड किलोमीटरपर्यंत पायपीट होत होती. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात येत होत्या. परंतु, उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडत होते.

दरम्यान, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतले होते. मात्र, पाण्याची गंभीर स्थिती पाहून पिकांचे पाणी बंद करुन अधिग्रहणाच्या माध्यमातून गावास पाणीपुरवठा सुरु केला. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागली होती.

६९४ अधिग्रहणेजिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. त्यातील बहुतांश गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे ७९४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता.उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने काही गावांसाठी टँकर सुरु करण्यात आले. ४७ टँकरच्या माध्यमातून जलपुरवठा करण्यात आला होता.

शेतकऱ्यांकडून विचारणा...गेल्या वर्षी जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने टंचाई कमी झाली. त्यानंतर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पैशाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, निधी नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली होती. मार्चअखेरीला अधिग्रहणापोटी ३ कोटी ५६ लाख तर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी ३७ लाखांचा निधी उपलब्ध झाला.

निधी वर्ग करणे सुरूपाणीटंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई