शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

गेल्या उन्हाळ्यात पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिलं; तब्बल १० महिन्यांनी आले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:32 IST

गेल्या उन्हाळ्यात गावास पाणी दिले; विहीर अधिग्रहणाचे यंदा पैसे मिळू लागले !

लातूर : भरउन्हात गावकऱ्यांची होणारी पायपीट पाहून बळीराजाने पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिले. त्यामुळे पदरात पडणाऱ्या पिकांचे नुकसान सहन करीत गावची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यांचे अधिग्रहणाच्या पैशाकडे डोळे लागून होते. तब्बल दहा महिन्यांनी ३ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे गतवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवत होत्या. फेब्रुवारीपासून तर टंचाईचे चटके वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची घागरभर पाण्यासाठी एक-दीड किलोमीटरपर्यंत पायपीट होत होती. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात येत होत्या. परंतु, उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडत होते.

दरम्यान, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतले होते. मात्र, पाण्याची गंभीर स्थिती पाहून पिकांचे पाणी बंद करुन अधिग्रहणाच्या माध्यमातून गावास पाणीपुरवठा सुरु केला. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागली होती.

६९४ अधिग्रहणेजिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. त्यातील बहुतांश गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे ७९४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता.उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने काही गावांसाठी टँकर सुरु करण्यात आले. ४७ टँकरच्या माध्यमातून जलपुरवठा करण्यात आला होता.

शेतकऱ्यांकडून विचारणा...गेल्या वर्षी जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने टंचाई कमी झाली. त्यानंतर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पैशाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, निधी नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली होती. मार्चअखेरीला अधिग्रहणापोटी ३ कोटी ५६ लाख तर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी ३७ लाखांचा निधी उपलब्ध झाला.

निधी वर्ग करणे सुरूपाणीटंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई