शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज

By हणमंत गायकवाड | Updated: May 17, 2023 14:28 IST

लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.

लातूर:आषाढी एकादशीनिमित्त श्री शेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठीही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे.

लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. १०२ बसेसचा एक लाख ८५ हजार ५४० किलोमीटरचा प्रवास होणार आहे. त्यातून महामंडळाला ८९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय, वारकऱ्यांच्या मागणीनुसार गाडी सोडण्याचे नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रा आरामदायी आणि सुखरूप होण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती विभागीय निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली. पाचवी आगारातून धावणार बसेस बार्शी-पंढरपूर, तुळजापूर-सोलापूर, निलंगा-सोलापूर -पंढरपूर, उदगीर-लातूर-सोलापूर-पंढरपूर या मार्गावरून वारकऱ्यांसाठी पंढरपूर यात्रा बसेस धावणार आहेत.

या बसेसच्या आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यात्रा बसला सवलतीच्या सर्वच योजना लागू.... यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना, महिलांसाठी सन्मान योजना, दिव्यांग व अपंगांसाठी सवलत योजनांसह ज्या म्हणून महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी योजना लागू केल्या आहेत. त्या सर्व योजना यात्रा बसलाही आहेत,अशी माहितीही विभागीय निरीक्षक देशमुख यांनी दिली.

८९ लाखांचे उत्पन्न अपेक्षित.... पंढरपूर यात्रेसाठी या १०२ बसेसचा एक लाख ८५ हजार ५४० किमी प्रवास होणार असून यातून ८९ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

टॅग्स :laturलातूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीstate transportएसटी