शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

पावसाने उघडीप दिल्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST

येरोळ : येरोळ व परिसरात पावसाने १०-१२ दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी ...

येरोळ : येरोळ व परिसरात पावसाने १०-१२ दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. त्यांची पिके उगवली असून, पाऊस नसल्याने कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे तुषार सिंचनाद्वारे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात मृगात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महागामोलाचे बी-बियाणे, खते खरेदी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या. दरम्यान, पिके उगवण्यास सुरुवात झाली. मात्र, दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल म्हणून उपलब्ध जमिनीतील ओलीवर पेरणी केली. पावसाने उघडीप दिल्याने अंकुर फुटण्याअगोदरच बियाणे जमिनीत करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

काही शेतकरी शेतातील विहीर, बोअरच्या उपलब्ध पाण्यावर सिंचनाद्वारे पाणी देऊन कोवळी पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी भीती वाढली आहे. खरिपातील पिके उगवली असून, पाऊस मात्र गायब झाला आहे. पीकवाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे, असे येथील शेतकरी सतीश साकोळकर यांनी सांगितले.