शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र ...

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यासोबतच रासायनिक खतांची १ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली असून, आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगामासाठी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन, ९० हजार हेक्टरवर तूर, १७ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी, ८ हजार हेक्टरवर कापूस, ९ हजार २०० हेक्टरवर उडीद, ११ हजार हेक्टरवर मूग तर ८ हजार ३९० हेक्टरवर इतर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६ लाख १६ हजार ८१३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने खते, बियाणांचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शेतकरीही मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाच्यावतीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, बियाणे, खतांच्या नियंत्रणासाठी तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे, तसेच जिल्हा स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

१ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची गरज...

खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये युरिया ३४ हजार, डीएपी ४० हजार, एमओपी ७ हजार, एसएसपी २० हजार, एनपीके ५६ हजार ८०० या खतांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यापैकी २५ हजार मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. तर सध्या तालुकानिहाय ५३ हजार ५४० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

१ लाख २५ हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता...

खरिपासाठी १ लाख २५ हजार ५० क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. त्यानुसार बियाणाची मागणी करण्यात आली आहे. सध्या ३४ हजार २०५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, कापूस, तीळ आदी बियाणांचा समावेश आहे. सर्वाधिक १ लाख १८ हजार १२४ क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी नाेंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीजकडून मागणीनुसार पुरवठा झाला असून, उर्वरित बियाणे लवकरच मिळणार आहेत.

कृषी विभागाची तयारी पूर्ण...

खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्यावतीने पेरणी क्षेत्र, बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहेत; तसेच खते आणि बियाणांच्या नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, अधिकच्या दराने बियाणे आणि खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.