शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र ...

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यासोबतच रासायनिक खतांची १ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली असून, आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगामासाठी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन, ९० हजार हेक्टरवर तूर, १७ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी, ८ हजार हेक्टरवर कापूस, ९ हजार २०० हेक्टरवर उडीद, ११ हजार हेक्टरवर मूग तर ८ हजार ३९० हेक्टरवर इतर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६ लाख १६ हजार ८१३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने खते, बियाणांचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शेतकरीही मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाच्यावतीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, बियाणे, खतांच्या नियंत्रणासाठी तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे, तसेच जिल्हा स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

१ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची गरज...

खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये युरिया ३४ हजार, डीएपी ४० हजार, एमओपी ७ हजार, एसएसपी २० हजार, एनपीके ५६ हजार ८०० या खतांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यापैकी २५ हजार मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. तर सध्या तालुकानिहाय ५३ हजार ५४० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

१ लाख २५ हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता...

खरिपासाठी १ लाख २५ हजार ५० क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. त्यानुसार बियाणाची मागणी करण्यात आली आहे. सध्या ३४ हजार २०५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, कापूस, तीळ आदी बियाणांचा समावेश आहे. सर्वाधिक १ लाख १८ हजार १२४ क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी नाेंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीजकडून मागणीनुसार पुरवठा झाला असून, उर्वरित बियाणे लवकरच मिळणार आहेत.

कृषी विभागाची तयारी पूर्ण...

खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्यावतीने पेरणी क्षेत्र, बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहेत; तसेच खते आणि बियाणांच्या नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, अधिकच्या दराने बियाणे आणि खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.