शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पावसाअभावी खरीप धोक्यात; तात्काळ पंचनाम्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

By हरी मोकाशे | Updated: September 2, 2023 19:33 IST

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे ...

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पीकविम्यासंदर्भात योग्य कारवाई लवकरात लवकर करावी. पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी, महसूल व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या आहेत.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांकडून देण्यात आली.

पाण्याचे नियोजन करावे...लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाची पाणीपातळी २४ टक्क्यांपेक्षाही खाली गेली आहे. या बाबीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस