शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पावसाअभावी खरीप धोक्यात; तात्काळ पंचनाम्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

By हरी मोकाशे | Updated: September 2, 2023 19:33 IST

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे ...

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पीकविम्यासंदर्भात योग्य कारवाई लवकरात लवकर करावी. पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी, महसूल व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या आहेत.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांकडून देण्यात आली.

पाण्याचे नियोजन करावे...लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाची पाणीपातळी २४ टक्क्यांपेक्षाही खाली गेली आहे. या बाबीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस