शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप धोक्यात; तात्काळ पंचनाम्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

By हरी मोकाशे | Updated: September 2, 2023 19:33 IST

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे ...

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पीकविम्यासंदर्भात योग्य कारवाई लवकरात लवकर करावी. पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी, महसूल व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या आहेत.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांकडून देण्यात आली.

पाण्याचे नियोजन करावे...लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाची पाणीपातळी २४ टक्क्यांपेक्षाही खाली गेली आहे. या बाबीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस