शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

लातूरहून निघालेली केदारनाथ, बद्रिनाथ यात्रा बस नेपाळ हद्दीत पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:23 IST

लातूरहून एकूण 49 प्रवाशांसह 55 जणांना घेवून केदारनाथ, बद्रिनाथ यात्रेला निघालेली एक खासगी बस नेपाळ हद्दीत शुक्रवारी(11 मे) पहाटे पेटवण्यात आली.

लातूर : लातूरहून एकूण 49 प्रवाशांसह 55 जणांना घेवून केदारनाथ, बद्रिनाथ यात्रेला निघालेली एक खासगी बस नेपाळ हद्दीत शुक्रवारी(11 मे) पहाटे पेटवण्यात आली. दरम्यान, सर्व भाविक सुखरुप असून, बसमधील सर्व साहित्य व जवळपास 5 लाख रुपये रोख जळून खाक झाले आहेत. यात्रा व्यवस्थापक सिद्धेश्वर मोहिते यांनी सांगितले. लातूर येथून 49 भाविक व इतर सहका-यांसह 55 जणांची खासगी बस 30 एप्रिल रोजी प्रवासाला निघाली होती. केदारनाथ-बद्रिनाथ यात्रा करुन ही बस नेपाळ दर्शनासाठी 9 मे रोजी पुढे निघाली.

मात्र, भरत घाटामध्ये बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे भाविकांची जवळच निवास व्यवस्था करण्यात आली. तर यात्रा व्यवस्थापकाचे साडेतीन लाख रुपये तसे इतर भाविकांची रक्कम, सोबत आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, महिनाभराचे किराणा साहित्य बसमध्येच होते. त्यामुळे बसमध्ये चालकासह चार जण झोपले होते. अचानक शुक्रवारी पहाटेच्या १ वाजेच्या सुमारस बसच्या डाव्या बाजूकडील चाक पेटल्याचे रामदास अंगद इरले यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बसची राखण करण्यासाठी बसमध्येच झोपलेले सर्वजण बाहेर पडले.

सोबत असलेल्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले. शेवटी, बसमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर यात्रा व्यवस्थापकाने सर्व भाविकांना भरत घाट येथून भारताच्या हद्दितील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा या तालुक्याच्या ठिकाणी आणले.  सध्या हे सर्व भाविक नौतनवा येथील धर्मशाळेत आश्रयाला असून, कोणालाही इजा झालेली नाही, असे मोहिते यांनी सांगितले. परंतु, सर्व साहित्य जळाल्याने अंगावरील कपड्यावरच हे भाविक धर्मशाळेत आश्रयाला आहेत. यात्रा व्यवस्थापक दुस-या बसची व्यवस्था करुन सर्वांना लातूरला परत आणणार आहेत. तोपर्यंत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तेथील प्रशासानाशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिका-यांकडून मदत...यात्रेतील एका भाविकाकडून लातूर येथील सतीश जाधव यांना घडल्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी सदर माहिती ‘लोकमत’ला कळवून अडकलेल्या भाविकांना मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याशी संवाद साधून भाविकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरु झाली.